प्रदीर्घ लढा, ऐक्य व संघर्षापोटीच प्रकल्प ग्रस्तांना सन्मानजनक नोकऱ्या व भरीव मोबदला: हंसराज अहीर

धोपटाळा प्रकल्पातील 75 वेकोलि प्रकल्पग्रस्तांना नोकरीचे नियुक्तीपत्र प्रदान

तिरुपती नल्लाला, राजुरा तालुका प्रतिनिधी
मो. 98224 77446

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- नियुक्तीपत्र स्वीकारतांना वेकोलि प्रकल्पग्रस्तांच्या चेहऱ्यावरील आनंद अतिव समाधान देणारा असुन अशाप्रकारे सार्वजनिक स्वरुपात नियुक्तीपत्र प्रदान करणारा सन्मानजनक सोहळा हा सुध्दा संघर्ष व लढ्याचाच भाग आहे. यापुर्वी 3 एकर जमिनीपोटी एक नोकरी देण्यात येत होती ती आता 2 एकरवर एकास नोकरी दिली जात असून जमिनीला योग्य भाव मिळतो आहे. हा शेतकऱ्यांनी केलेल्या ऐक्य व संघर्षाचेच फलित असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.

वेकोलि बल्लारपूर क्षेत्राच्या मनोरंजन केंद्र सास्ती (धोपटाळा) येथे दि. 03 में, 2023 रोजी पार पडलेल्या वेकोलि प्रकल्पग्रस्तांना नियुक्तीपत्र प्रदान कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणुन मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. या कार्यक्रमास खासदार बाळुभाऊ धानोरकर, आमदार सुभाष धोटे, वेकोलि मुख्यालयाचे तांत्रिक निदेशकव्दय जयप्रकाश व्दिवेदी, अनिल कुमार सिंह, बल्लारपूर क्षेत्रीय महाप्रबंधक सव्यसाची डे, भाजपा पदाधिकारी अरुण मस्की, प्रशांत घरोटे, हरीदास झाड़े आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलतांना अहीर म्हणाले की, जमिनीच्या बदल्यात 22 प्रकल्पात 15 वर्ष प्रखर लढ्यातून वेकोलिने प्रकल्पग्रस्तांना 11 हजाराचे वर नोकऱ्या व 2500 कोटी वाढीव मोबदला मिळवून दिला. या संघर्षात संबंधीत शेतकऱ्यांनी अनेक वर्ष साथ दिल्याने हे आंदोलन विरोधी पक्षात असताना सुध्दा यशस्वी होवु शकले. मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे सरकार स्थानापन्न झाल्यानंतर त्यांनी तातडीने वाढीव मोबदला कोल इंडीयाच्या माध्यमातून चंद्रपूर, यवतमाळ व नागपूर येथील खाण प्रकल्पग्रस्तांना देण्याकरीता पुढाकार घेतल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

देशात जमिनीच्या बदल्यात नोकरी हे धोरण केवळ कोल इंडीया व मॉइलमध्येच असल्याने लोकसभेत व स्टॅन्डींग कमिटीव्दारे तसेच आंदोलनाच्या माध्यमातून ही न्यायपूर्ण मागणी धसास लावण्यात यश मिळाले असेही ते म्हणाले. या नियुक्तीपत्र वितरण कार्यक्रमाच्या अनुशंगाने वेकोलिचे आभार व्यक्त करीत अन्य प्रलंबित प्रश्न ज्यात सुटलेल्या जमिनीचे अधिग्रहण, न्यायप्रविष्ठ प्रकरणे, अपात्र प्रकरणे त्वरीत निकाली काढण्याचे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना भाषणातून दिले. या प्रकल्पामध्ये 75 टक्केहुन अधिक ओबीसी शेतकरी असल्याची जाणीव करुन देतांनाच अहीर यांनी ओबी कंपन्यामध्ये 50 टक्के स्थानिकांना असंतोषाच्या पार्श्वभुमीवर रोजगार द्यावा. राज्य सरकारचे 80:20 धोरण लागु करावे अशाही मार्गदर्शनपर सुचना केल्या या कार्यक्रमात 75 पुरुष-महिला वेकोलि प्रकल्पग्रस्तांना नियुक्तीपत्रे मान्यवरांच्या शुभहस्ते व उपस्थितीत प्रदान करण्यात आली यावेळी प्रकल्पग्रस्त बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

आता लाडका पत्रकाराचा नंबर लागेल का ! महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री लक्ष देतील का ?

देवेंद्र सिरसाट हिंगणा तालुका नागपूर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री…

10 hours ago

नाशिक: पती पत्नीने गळफास लावून आत्महत्या, 10 वर्षीय चिमुकली मुलगी सुद्धा पलंगावर मृतावस्थेत.

मानवेल शेळके नाशिक जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नाशिक:- येथून एक खळबळजनक घटना…

11 hours ago

महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री स्व. शरद काळे यांचा स्मृति दिन साजरा.

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक: 17 सप्टेंबर 2024 रोज…

12 hours ago

कवठा येथील सरपंच प्रवीण जायदे यांच्यासह अनेकांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश.

खासदार अमर काळे, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या उपस्थितीत केला राष्ट्रवादित पक्ष प्रवेश. मुकेश चौधरी…

12 hours ago

सिंदी तहसील कार्यालय वर विविध मागण्यासाठी कामगार नेते डाॅ. उमेश वावरे यांच्या नेतृत्वात भव्य मोर्चा.

आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…

12 hours ago