इंडियन्स सोशल मूव्हमेंटच्या माध्यमातून झाली नांदगाव येथे आदिवासी बांधवांच्या पिण्याच्या पाण्याची सोय.

नांदगाव गावी आदिवासी बांधवांसाठी ५००० लिटर च्या 2 मोठ्या पाण्याची टाक्या त्या ठिकाणी बसविण्यात आल्या.

मंगेश जगताप, मुंबई प्रतिनिधी
मुंबई/रायगड:-
ग्रामीण भागात राहणाऱ्या आदिवासी कुटुंबांना अजुन पर्यंत मूलभूत अधिकार मिळत नाही असल्याचे वास्तव समोर आले आहे. आज ७५ वर्षे उलटली भारत देशाला स्वातंत्र्य मिळून तरी देखील अनुसूचित जमाती वर्गाची परिस्थिती जैसे थे आहे. भारतीय संविधान इथल्या भारतीय नागरिकांना सन्मानाने जगण्याचा अधिकार देते, पण गेली १० वर्ष ज्या ठिकाणी प्रशासनाकडून घाण पाणी पाजलं जात असे त्या ठिकाणी इंडियन्स सोशल मुव्हमेंट च्या पाठपुराव्याने पनवेल तालुक्यातील नांदगाव गावी आदिवासी बांधवांसाठी ५००० लिटर च्या 2 मोठ्या पाण्याची टाक्या त्या ठिकाणी बसविण्यात आल्या.

ज्या रायगड जिल्ह्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी चवदार तळ्याचा संघर्ष केला त्याच रायगड जिल्ह्यात आदिवासी बांधवाना पाण्याची टाकी बांधून देऊन त्यांना पाण्याच्या समस्येपासून मुक्त करण्याचा संकल्प करण्यात आला. भविष्यात ज्या ज्या ठिकाणी पाण्याची कमतरता आहे त्या ठिकाणी इंडियन्स सोशल मूव्हमेंट त्यांनी पाण्याची टाकी उपलब्ध करून देईल आणि अश्या 100 टाक्या आम्ही पनवेल तालुक्यातील आदिवासी बांधवांसाठी लावू असा एक संकल्प यावेळी केला आहे.

आजच्या पाण्याच्या टाकीच्या उदघाटन प्रसंगी संविधान मार्गदर्शक, लेखक, विचारवंत इंडियन्स सोशल मुव्हमेंटचे संस्थापक आनंदा होवाळ, राष्ट्रीय अध्यक्ष सविताताई सोनावणे कदम, मीडिया प्रमुख एवं अनुसूचित जाती जमाती संघर्ष कृती समिती अध्यक्ष प्रकाश कदम तसेच पनवेल अध्यक्ष नरेश परदेशी उपस्थित होते.

प्रशांत जगताप

Share
Published by
प्रशांत जगताप

Recent Posts

भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने महात्मा फुले वार्ड यशोधरा बुद्ध विहार हिंगणघाट येथे वर्षावास समाप्ती निमित्ताने कार्यक्रम संपन्न.

प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- भारतीय बौद्ध महासभा तालुका…

18 hours ago

सांगलीत पोलीस विवाहित महिलेने पाहिले लग्न लपवून केलं दुसरे लग्न, पोलिसांनी केला गुन्हा दाखल.

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- येथून एक खळबळजनक घटना समोर…

20 hours ago

वर्धा जिल्हा ग्रंथालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा.

प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि.16:- माजी राष्ट्रपती डॉ.…

2 days ago

भारतीय कम्युनिष्ठ पार्टी अहेरी विधानसभा कडून एटापल्ली येथे भव्य धरणे आंदोलन.

विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- दि.14 ऑक्टोबर 2024 सोमवार…

2 days ago

साहेब, दारूमुळे आणखी किती संसार उद्ध्वस्त होणार? दारूविरोधात दिंडवी गावातील महिलांचा आक्रमक लढा.

विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- तालुक्यातील जारावंडी-कसनसुर परिसरात अवैध…

2 days ago