✒️राज शिर्के, मुंबई (पवई) प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे २२ आमदार बाहेर पडण्याच्या मन:स्थितीत असून तसेच खासदारही शिंदे गटाला वैतागले आहेत. एकनाथ शिंदे गटात असलेल्या १३ पैकी ९ खासदार आमच्या संपर्कात आहेत असा मोठा दावा उद्धव ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. शंभूराज देसाई यांनी आमची गळचेपी होत आहे असा निरोप ठाकरेंना पाठवला असा दावाही त्यांनी केला आहे. राऊतांच्या या दाव्याने राज्यातील सरकार पडणार तरी नाही ना? अशी शंका निर्माण झाली आहे.
विनायक राऊत म्हणाले, एकनाथ शिंदे यांनी स्वत:चं बुड स्थावर केलं आहे. इतर कुणालाही किंमत मिळत नाही अशी तक्रार या आमदार आणि खासदारांची आहे. यामधील २२ आमदार बाहेर पडण्याच्या मन:स्थितीत असून शिंदेंसोबत असलेले खासदारही वैतागले आहेत. त्यांची कामं होत नाहीत. तुच्छतेची वागणूक मिळत असल्यानं त्यांच्या मनात खदखद आहे. त्यामुळे त्यांच्या कडील १३ खासदारांपैकी ९ खासदार आमच्या संपर्कात आहेत. शंभूराजे देसाई यांनी पंधरा दिवसापूर्वी उद्धव ठाकरेंना निरोप पाठवला होता. आमची इकडे गळचेपी होत आहे, असं देसाई यांनी उद्धव ठाकरे यांना सांगितलंय असा खळबळ जनक दावाही विनायक राऊत यांनी केला आहे. शिंदे गटाच्या आमदारांची कोंडी झाली आहे. तानाजी सावंत यांना बजेट मिळत नाही. आगीतून फुफाट्यात पडल्याचं ते म्हणत आहेत. असा म्हणत विनायक राऊतांनी खळबळ उडवून दिली आहे.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा. प्रशांत जगताप संपादक 9766445345-7385445348
उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हातकणंगले:- तालुक्यातील पट्टणकोडोली येथे ग्रामपंचायत च्या…
संतोष मेश्राम, राजुरा तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गोंडपिपरी दि.19:- लक्ष्मणराव जगगन्नाथ कुंदोजवर…
राजेंद्र झाडे, चंद्रपूर उपजिल्हा प्रतीनीधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गोंडपिपरी:- 1 सप्टेंबर ते 30…
वैशाली गायकवाड पुणे प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- शहरातील कर्वेनगर येथून एक खळबळजनक…
विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी. मोबाईल नं.9421856931 एटापल्ली: अम्ब्रीशराव आत्रामांच्या ‘अहेरी विधानसभा क्षेत्रातील जनतेला खड्ड्यात…
मधुकर गोंगले गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मोबाईल नं. 9420751809 तालुक्यातील झिंगानूर येथील रहिवाशी लच्चा मासा मडावी…