युवा शेतकरी पती आणि पत्नीने एकाच साडीने गळफास घेऊन आत्महत्या, सर्विकडे हळहळ.

प्रवीण जगताप, प्रतिनिधी

उस्मानाबाद:- येथून एक खळबळजनक घटना समोर येत आहे, एका पती आणि पत्नीने एकाच साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने सर्विकडे एकच धक्का बसला असून संपूर्ण जिल्हा हादळला आहे. सततच्या भांडणाला कंटाळून त्याचबरोबर खासगी कर्ज डोक्यावर असल्याने सदर पती आणि पत्नीने आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. सदर घटना उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील नायगाव या गावात घडली आहे. प्रकाश वसंत दीक्षित वय 30 वर्ष असे पतीचे नाव आहे. तर अश्विनी प्रकाश दीक्षित वय 27 वर्ष अशी आत्महत्या केलेल्या पती आणि पत्नीची नावे आहे.

प्राप्त माहितीनुसार, मयत प्रकाश दीक्षित हे मागील काही वर्षा पासून शेती करत होते. सततच्या नापिकीमुळे त्यांच्या डोक्यावर कर्जाचे ओझे झाले होते. त्यात यावर्षी मुसळधार पाऊसामुळे शेतीत पीक नाही त्यातच त्यांनी काही खासगी सावकारांकडून देखील कर्ज घेतले होते. शेतात काही पिकत नसल्याने कर्ज फिटत नव्हते. त्यामुळे त्यांनी आपली जमीन खासगी कर्ज फेडण्यासाठी विकली होती. त्यावरून दोघा पती आणि पत्नीमध्ये सतत वाद व्हायचा. याच उद्रेकातून दोघांनी टोकाचे पाऊल उचलले असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे.

दीक्षित कुटुंबातील पती-पत्नीने रविवारी म्हणजेच 21 ऑगस्ट रोजी रात्री राहत्या घरातील पत्र्याखालील लोखंडी आडूला एकाच साडीने गळफास घेऊन
आत्महत्या केली. सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. दरम्यान पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनास पाठवले असून, पती आणि पत्नीने केलेल्या आत्महेत्येमुळे परिसरात मोठी खळबळ माजली आहे.

मृतक प्रकाश यांच्या आईंनी सांगितले की, प्रकाश सतत निराश असायचा. कारण, खासगी कर्ज फेडण्यासाठी त्याने चार एकरपैकी दीड एकर जमीन विकली म्हणून प्रकाश आणि अश्विनी यांच्यामध्ये रोजच भांडण व्हायचे, या वादातूनच त्यांनी आत्महत्या केली असावी.’ प्रकाश व अश्विनी यांच्या मागे आई, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.

प्रशांत जगताप

Share
Published by
प्रशांत जगताप

Recent Posts

भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने महात्मा फुले वार्ड यशोधरा बुद्ध विहार हिंगणघाट येथे वर्षावास समाप्ती निमित्ताने कार्यक्रम संपन्न.

प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- भारतीय बौद्ध महासभा तालुका…

22 hours ago

सांगलीत पोलीस विवाहित महिलेने पाहिले लग्न लपवून केलं दुसरे लग्न, पोलिसांनी केला गुन्हा दाखल.

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- येथून एक खळबळजनक घटना समोर…

24 hours ago

वर्धा जिल्हा ग्रंथालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा.

प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि.16:- माजी राष्ट्रपती डॉ.…

2 days ago

भारतीय कम्युनिष्ठ पार्टी अहेरी विधानसभा कडून एटापल्ली येथे भव्य धरणे आंदोलन.

विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- दि.14 ऑक्टोबर 2024 सोमवार…

2 days ago

साहेब, दारूमुळे आणखी किती संसार उद्ध्वस्त होणार? दारूविरोधात दिंडवी गावातील महिलांचा आक्रमक लढा.

विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- तालुक्यातील जारावंडी-कसनसुर परिसरात अवैध…

2 days ago