राज्याच्या कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतल्या नंतर धर्मराव बाबा आत्राम यांचे अहेरी राजनगरीत जल्लोषात स्वागत.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात अतिदुर्गम व नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर गडचिरोली जिल्ह्यातील त्यांच्या अहेरी विधानसभा क्षेत्रात प्रथमच आगमनानिमित्त ठिकठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले.

7 जुलै रोजी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांचे गडचिरोली जिल्ह्यात आगमन झाले. 8 जुलै रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे ‘शासन आपल्या दारी, उपक्रमासाठी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. मंत्री आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी सुद्धा या कार्यक्रमात उपस्थित होते. हा कार्यक्रम आटोपताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार मुंबईकडे रवाना झाले. त्यांनतर सायंकाळ च्या सुमारास मंत्री धर्मराव बाबा आत्राम हे अहेरी येथील त्यांच्या निवासस्थानाकडे रवाना झाले होते.

चामोर्शी, आष्टी, मुलचेरा येथे राष्ट्रवादी काँग्रेस तसेच विविध पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भव्य मिरवणूक काढत त्यांचे पुष्पगुच्छ, शॉल, श्रीफळ देऊन स्वागत केले. सायंकाळच्या सुमारास आलापल्ली येथे आगमन होताच मुख्य चौकातून भव्य मिरवणूक काढून ढोल ताशांच्या गजरात डीजेच्या तालावर नाचत,फटाक्यांचा आतषबाजी करत स्वागत करण्यात आले.त्यानंतर नागेपल्ली येथे मिरवणूक काढून स्वागत करण्यात आले.रात्री 10 वाजताच्या सुमारास ते अहेरी मुख्यालयात पोहोचले. यावेळी दक्षिणमुखी हनुमान मंदिर परिसरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली.

यावेळी गांधी चौक येथे आयोजित सभेला त्यांनी संबोधित केले. आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या रूपाने गडचिरोली जिल्ह्याला पहिल्यांदाच कॅबिनेट मंत्रीपद मिळाल्याने अहेरी येथील राजनगरीत एकच जल्लोष करण्यात आला. विविध संघटना तसेच विविध समाजाकडून पुष्पगुच्छ,शॉल श्रीफळ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी हजारोच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी कुटुंबीयांकडून मंत्रौच्चार करत औक्षण अहेरी येथील गांधी चौकात आयोजित सभेला संबोधित केल्यावर मंत्री धर्मराव बाबा आत्राम हे आपल्या निवासस्थानाकडे रवाना झाले. राजवाडा परिसरात त्यांचे आगमन होताच घरच्या सदस्यांनी मंत्रोच्चार करत फुलांचा वर्षाव करत औक्षण करण्यात आले. एवढेच नव्हे तर घरच्या मंडळींनी धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते केक कापून सर्वांचे तोंड गोड करत आनंद द्विगुणीत केला.

यावेळी माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री आत्राम, सिनेट सदस्य तनुश्री आत्राम, युवा नेते ऋतुराज हलगेकर, माजी पंचायत समिती सदस्य हर्षवर्धन बाबा आत्राम, डॉ. मिताली आत्राम, रामेश्वर बाबा आत्राम, जे. डी सडमेक तसेच राज परिवारातील आदी सदस्य उपस्थित होते.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

मनवेल शेळके

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

सावनेर येथे गणपती मूर्ती खरेदीवर लकी ड्रॉ चा वर्षाव.

अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर:- सावनेर येथील प्रसिद्ध मूर्तिकार…

8 hours ago

शेतकऱ्यांच्या मुलांची आर्थिक उन्नती हेच माझे ध्येय: ऍड. संजय धोटे राजुरा मुक्तीसंग्राम दिन प्रतिपादन.

क्रांतीची लाट उठविणाऱ्या गावात मुक्तीसंग्राम दिनाचा जल्लोष. संतोष मेश्राम, राजुरा तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज…

9 hours ago

बौद्ध धम्म संस्कार संघ श्रावस्ती विहार सांगलीच्या वतीने वर्षावासाच्या निमित्त धम्मदेशना कार्यक्रम संपन्न.

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- बौद्ध धम्म संस्कार संघ श्रावस्ती…

9 hours ago

ब्रिलीअंट सीबीएसई स्कूल हिंगणघाट येथे हिंदी दिवस उत्साहात साजरा.

अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:-विद्या विकास शिक्षण संस्था हिंगणघाट…

9 hours ago

गडचिरोली: ऊसाच्या शेतात जिवंत विद्युत प्रवाह साेडलेला तारांना स्पर्श झाल्याने 17 वर्षाच्या मुलाचा मृत्यू.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिराेली:- जिल्हातील देसाईगंज तालुक्याच्या बाेळधा…

9 hours ago