विश्वास त्रिभुवन अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज!ऑनलाईन अहमदनगर:- जिल्हातील अस्तगाव येथील न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयात कारगिल विजय दिवसाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. माजी सैनिक ज्ञानेश्वर जेजुरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
आधुनिक काळात मानवी जीवनामध्ये बऱ्याच गोष्टी ह्या सहजासहजी मिळत असल्या तरी देश सेवा करण्याचे भाग्य मात्र नशिबानेच मिळत असते, असे प्रतिपादन न्यू इंग्लिश स्कूल अस्तगाव विद्यालयात आयोजित कारगिल विजय दिवस कार्यक्रमात माजी सैनिक ज्ञानेश्वर जेजुरकर यांनी केले. सैन्यात भरती होण्याचे गुण हे बालपणा हे पासूनच अंगीकृत करावे लागतात. दया, माया, शांती या गोष्टींना सैनिकी जीवनामध्ये कोणताही थारा नसतो. जीवंत माणसाला गोळ्या घालण्याचे धाडस सैनिकांमध्ये असावे लागते. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ किंवा बायोलॉजी अशा विषयांमध्ये प्राविण्य मिळवून आपण आर्मी मध्ये अधिकारी पदावर पोहोचू शकतो. मात्र त्यासाठी आपली शारीरिक कुवत, बौद्धिक क्षमता देखील तितकीच महत्त्वाची असते. स्वयंशिस्त महत्त्वाची असते. मुलींसाठी आर्मीमध्ये भरती होणे हे आजच्या काळामध्ये थोडेसे जोखमीचे असले तरी आर्मीच्या आरोग्य खात्यात भरती होणे त्यांच्या दृष्टीने योग्य ठरते असेही त्यांनी सांगितले. कारगिल युद्धामध्ये आलेले विविध अनुभव सांगून शेवटी भारत माता की जय या त्यांनी दिलेल्या घोषणेने संपूर्ण विद्यालय परिसर दुमदुमून निघाला होता. यावेळी माजी सैनिक रंजनकुमार सुलाखे यांनी कारगिल युद्धामध्ये आलेले प्रत्यक्ष अनुभव सांगताना सर्वांच्या अंगावर शहारे आले होते. त्यांनी गायलेल्या…
सारे ऋतू आपल्याला,
थंडीत स्वेटर आपल्याला,
उन्हात A. C, पावसात रेनकोट आपल्याला,
कधी जाऊन बघा सीमेवर माझ्या सैनिकाला, आपण मात्र आनंदात जगतोय, सैनिक मात्र देशासाठी लढतोय… या कवितेने सर्वांच्या डोळ्यात अश्रू आले.
या कार्यक्रमाच्या शेवटी विद्यालयाची विद्यार्थिनी मयुरी सुलाखे हिने गायलेल्या भारत का झेंडा सुहाना लगता है या गीताने सर्वांना मंत्रमुग्ध केले. यावेळी प्रदीप गोर्डे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी योगेश मोगले, संजय को-हाळे, निलेश गोर्डे हे सर्व माजी सैनिक उपस्थित होते. प्रभारी मुख्याध्यापक प्रमोद तोरणे यांनी प्रास्ताविक करून उपस्थित माजी सैनिकांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संतोष कदम, ज्ञानेश्वर केदार, प्रदीप तडवी रोहिदास पोटकुले, संतोष सोनवणे, सचिन चौधरी सखाराम शिंदे, जालिंदर गायकवाड, छाया जेजुरकर यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन वृषाली बेल्हेकर यांनी केले. तर आभार प्रतीक्षा थोरात यांनी मानले.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- भारतीय बौद्ध महासभा तालुका…
उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- येथून एक खळबळजनक घटना समोर…
प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि.16:- माजी राष्ट्रपती डॉ.…
विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- दि.14 ऑक्टोबर 2024 सोमवार…
विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- तालुक्यातील जारावंडी-कसनसुर परिसरात अवैध…
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- येथून एक खळबळजनक घटना समोर…