रुपसेन उमराणी, मुंबई ब्यूरो चीफ
मुंबई:- ऑल इंडिया पँथर सेना लवकरच मुंबई मोठे आंदोलन करणार आहे अशी माहिती प्रेस रिलिज प्रसिद्ध करून महाराष्ट्र संदेश न्युजला दिली. हे आंदोलन राज्य आणि देश पातळीवरचे अनेक मुद्द्यांना घेऊन करण्यात येणार आहे.
कोणत्या प्रश्नावर आंदोलन..
इंद्रकुमार मेघवाल हत्याकांड निषेधार्थ, गॅस, डिजेल, पेट्रोल महागाईच्या दरवाढीबाबत, महिलां, बेटीच्या रक्षणांसाठी, संविधान बचाओ, भिमाकोरेगाव दंगलीतील 35000 तरुणांवर गुन्हे दाखल झालेले त्वरीत माघार घेण्यात यावे, खुलेआम शास्ञ बाळगणाऱ्या आरएसएस सारख्या संघटेनेला तात्काळ बंदी घालण्यात यावी व कठोर शासन लागु करण्यात यावं. बेरोजगारांना रोजगार देण्यात यावा,ओबीसी आरक्षणाची तरतुद लवकर जाहीर करण्यात यावं, मराठा आरक्षण लवकरात लवकर लागु करण्यात यावं, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर करुन सन्मानित करण्यात यावं, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मस्थानी भव्य दिव्य स्मारक करण्यात यावं, 250 दलित हत्याकांडाबाबत आरोपीवर कठोर शासन करण्याचं यावं, प्रत्येक पिडितांना 250000 रुपये मदत करण्यात यावी व प्रत्येक कुटुंबातील सदस्यांना शासकीय नौकरी मध्ये सामावुन घेण्यात यावं, बेहाल शेतकऱ्यांचे, कर्जमाफ करण्यात यावे,12000,ऑट्रोसिटी प्रलंबित केसेसबाबत व इतर देशव्यापी मुद्दयावर राज्य व क्रेंद्र सरकारच्या विरोधात लवकरचं मुंबईत ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपकजी केदार यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील पँथर मुंबई धडकणार आहे अशी माहिती प्रेस रिलिज प्रसिद्ध करून देण्यात आली.
दलित, मुस्लिम, अनुसुचित जाती जमाती, भटक्या विमुक्त आदिवासी, वंचित, शोषित, पिडित, बहुजनांच्या न्याय हक्कासाठी हा व्यापक लढा ऑल इंडिया पँथर सेनेच्या माध्यामतुन तीव्र करण्यात येत आहे. राज्यातील मंत्री असंवेदनशील आहेत, राज्यसभेत, विधानसभेत बहुजनांचा वाली म्हणुन प्रश्न मांडायला कोणीही तयार नाही, मिडिया चाटुगिरी करते, मुख्यमंत्री आयकला तयार नाही, महाराष्ट्रात गुंडशाही, हिटलरशाही, हुकूमशाहीच्या प्रवृत्तीला सुरुवात झाली आहे. लोकशाही नावाला राहिली दिनदुबळयांना बंदिस्त करण्याचा डाव आखला जातो.गुलामीच्या दलदलीत बहुजनांची पोरं आडकली आहेत. अशा या भंयान संकटात माझा बहुजन समाज आहे. शिक्षणापासुन वंचित व बेघर केलं जात आहे. आज मानवता जिंवत राहीली नाही असे अनेक प्रश्न घेवुन मुंबईत हे वादळ धडकणार आहे. सरकारला जाब विचारण्यासाठी हा वाघ मैदानात उतरुन भिडत आहे.भिडत भिडत मरण जरी आले तरी चालेलं पण पँथर शरण जाणार नाही.!
या लढयात सर्वजण ताकतीने सामिल व्हा आणि अध्यक्ष दिपकजी केदार यांचे हात बळकट करा. असे आव्हान महाराष्ट्र संदेश न्युज ला दिलेल्या प्रेस नोट मध्ये कुणाल इंगळे जिल्हाध्यक्ष यांनी केले.
राज शिर्के मुंबई महानगर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मिरा भाईंदर:- जगाला बुद्ध धम्माशिवाय…
आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- स्थानीय चौधरी वॉर्ड हिंगणघाटचे…
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांचा हिंगणघाट येथे दौरा. अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुलगाव:- स्थानीक गुन्हे शाखा वर्धा…
उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- सेवक संघटित व संघटित आरोग्य…
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवर पोलिसांची तैनाती. हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी महाराष्ट्र…