संतोष मेश्राम, राजुरा प्रतिनिधी मोबा.न.9923497800
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपुर:- महाराष्ट्र राज्यात ऊस, सोयाबीन, मिरची, कापूस, धान, इतर कडध्यान व फळबागांसह इतरही पिकाचे उत्पन्न मोठया प्रमाणावर घेतले जाते. रब्बी हंगामातही अनेक शेतकरी पिकाचे उत्पन्न घेत असल्यामुळे शेतकऱ्यांना शेतमजुरांचा हातभार घेतल्या शिवाय शेत पिके घेता येत नाही. मात्र यावेळी शेतामध्ये काम करणाऱ्या शेतकऱ्याचा अपघात झाल्यास शेतकऱ्याला स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेचा लाभ दिल्या जाते. परंतु शेतीचे काम करीत असलेल्या शेतमजुराचा अपघात झाल्यास त्याला स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेचा लाभ दिल्या जात नाही. यामुळे शेतमजुरांवर अन्याय होत आहे.
स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेच्या कार्यकक्षा वाढवुन शेतकऱ्यांसोबतच शेतमजुरांचाही समावेश करून गेल्या वर्षभरात राज्यात शेतात काम करीत असलेल्या शेतमजुरांचा नैसर्गिक आपत्तीमुळे मृत्यु अथवा अपंगत्व आलेल्या सर्वशेतमजुरांना या योजनेचा लाभ द्यावा यासाठी आपण स्वतः पुढाकार घ्यावा याबाबतचे निवेदन राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचे कडे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांनी केली असुन याबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल याबाबतचे आश्वासन मुंडे यांनी भटारकर यांना दिले.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348
* सरकारच्या अपयशाचा मांडणार लेखाजोखा* मधुकर गोंगले,गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.मो. नं.9420751809 गडचिरोली :: गडचिरोली जिल्हा काँग्रेस…
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक: 17 सप्टेंबर 2024 रोज…
खासदार अमर काळे, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या उपस्थितीत केला राष्ट्रवादित पक्ष प्रवेश. मुकेश चौधरी…
*मातृशक्ती, नारीशक्तीचा, ता.चामोर्शीत मा.खा. अशोकजी नेते यांच्या पुढाकाराने भव्य महिला मेळावा आयोजित* *मधुकर गोंगले, गडचिरोली…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- भाजपाचे महामंत्री दिनेश वर्मा…