पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर’ यांचे नाव देण्याची मागणीसाठी धनगर प्रतिष्ठानचा पाठपुरावा
नितीन शिंदे ठाणे जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज! ऑनलाईन ठाणे:- ठाणे शहरातील प्रसिद्ध तलावांपैकी एक असलेल्या उपवन तलावाकाठी बांधलेल्या भव्य दिव्य घाटाचे नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उदघाटन झाले. स्थानिक ओवळा – माजिवडा मतदार संघाचे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून झालेल्या या घाटाला ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर’ यांचे नाव देण्याची मागणी धनगर प्रतिष्ठानने आमदार सरनाईक यांच्याकडे केली होती. या मागणीचा सकारात्मक विचार करून आमदार सरनाईक यांनी याबाबत ठाण्याचे पालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे या घाटाला ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर’ यांचे नाव द्यावे, या मागणीचे निवेदन दिले आहे. त्यामुळे देशभरात विविध मंदिरे आणि घाटांचा जीर्णोद्धार करणाऱ्या अत्यंत महत्वाच्या व्यक्तीच्या स्मृतीची या निमित्ताने दखल घेतली जाणार आहे.
उपवन तलावाच्या येथे बनारस घाटाच्या धर्तीवर ठाणे शहरातील पहिले उपवन घाट बनविण्यात आले. या घाटाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. या उपवन घाटाला अनेक हिंदू तीर्थक्षेत्रे तसेच बनारस घाट व शरयू नदीच्या तिरावर घाट बांधणाऱ्या “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर” यांचे नाव देण्यात यावे यासाठी धनगर प्रतिष्ठानच्या वतीने अध्यक्ष दीपक कुरकुंडे यांच्यासह समाजाचे नेते भगवान देवकाते, महिला मंडळ अध्यक्षा माधवी नाईक,प्रतिष्ठाचे कार्याध्यक्ष महेश गुंड,गणेश बारगीर,उत्तम यमगर,उद्धव गावडे,महिला मंडळ सचिव गायत्री गुंड,स्मिता गावडे यांनी स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून आमदार प्रताप सरनाईक यांच्याकडे निवेदन देऊन मागणी केली. सरनाईक यांनी तात्काळ या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत ठाणे पालिका आयुक्त अभिजित बांगर यांना निवेदन देत या घाटाला ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर’ यांचे नाव देण्याची मागणी केली.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या पेशवेकालीन मराठ्यांचे वीर सेनानी मल्हारराव होळकर यांच्या सून असून त्यांचा जन्म इ.स. दि. ३१ मे १७२५ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालूक्यातील चौंडीया खेड्यात झाला. अहिल्यादेवींचे पती खंडेराव होळकर हे इ.स. १७५४ मध्ये कुम्हेरच्या लढाईत धारातीर्थी पड़ले, त्यानंतर १२ वर्षानी मल्हारराव होळकर यांचे देखील निधन झाले. त्यांच्या पश्चात मराठा साम्राज्याच्या माळवा प्रातांचा कारभार अहिल्यादेवी बघू लागल्या. अहिल्यादेवी लढाईमध्ये स्वतः सैन्याचे नेतृत्व करीत होत्या. त्याचबरोबर त्या उचित न्यायदानासाठी देखील प्रसिध्द होत्या. त्यांनी भारतभर अनेक हिंदू मंदिरे व नदी घाट बांधले. त्यांनी काशी विश्वेश्वर,सोमनाथ सारख्या अनेक मंदिरांचा जिर्णाध्दार केला. त्यांनी अनेक तिर्थक्षेत्री धर्मशाळांचे बांधकाम केले असून त्या अनेक देवळांच्या आश्रयदात्या होत्या. लोकांना रोजगार मिळावा म्हणून त्यांनी त्या काळामध्ये औद्योगिक धोरण आखले होते.
देवेंद्र सिरसाट हिंगणा तालुका नागपूर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री…
मानवेल शेळके नाशिक जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नाशिक:- येथून एक खळबळजनक घटना…
* सरकारच्या अपयशाचा मांडणार लेखाजोखा* मधुकर गोंगले,गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.मो. नं.9420751809 गडचिरोली :: गडचिरोली जिल्हा काँग्रेस…
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक: 17 सप्टेंबर 2024 रोज…
खासदार अमर काळे, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या उपस्थितीत केला राष्ट्रवादित पक्ष प्रवेश. मुकेश चौधरी…