निवेदन देताना माजी पंचायत समितीचे सभापती भास्कर तलांडे यांच्या मार्फतीने माजी जि. प. अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांना निवेदन.
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या येरमनार ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या कोरेपल्ली गावातील एकूण 40 ते 50 वस्तीतील गाव असून या गावात जवळपास 300 ते 400 लोकसंख्या असून आजही विकासापासून कोसो दूर आहे, शासनाला व प्रशासनाला अनेकदा निवेदन देऊन सुद्धा जाणूनबुजून दुर्लक्ष करीत नाही न असा सवाल गाववासियांना पडला आहे.
निवडणुकीचा वेळेस नको ते पुढारी येतात व पुकटचे आस्वासन देऊन जातात परंतु निवडनुक झाली की, या परिसरात कोणीच शासन किव्हा लोकप्रतिनिधी हुंगून सुद्धा पाहत नाही, या परिसरातील आम्हचे दुःख, व्यथा, समस्या कोणाला सांगावं काहीस समजत नाही. या दृष्टीकोनातून अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर तलांडे यांनां कोरेपल्ली गावात स्वतः जाऊन त्या लोकांनी गावातील समस्याबद्दल निवेदन देण्यात आले आहे.
अहेरी तालुक्यातील राजाराम खांदला वरुन अवघ्या 10 किमी अंतरावर असलेल्या कोरेपल्ली गावात त्या ठिकाणी दळणवळनाची सुविधा नाही, आजही कच्या रस्त्यानी प्रवास करावा लागत असतो. डोंगरदर, घनदाट जंगल, उन्हाळ्यात, हिवळ्यात आणि पावसाळ्यात तर अनेकांनां जीव गमावावे लागत असते, मोठमोठे दगळावरुन ये-जा करावा लागत असतो. राजाराम (खां) प्राथमिक आरोग्य पथक असून कोरेपल्ली दवाखान्यात एक परिचारिका नेमणूक करण्यात आले परंतु परिचारिका मुख्यालयी न राहता महिनाभरातून 5 ते 6 वेळा मनमर्जीनुसार येत असतात, गरोदरमातांना रस्त्यावरच जीव गमावण्याची शक्यता नाकारता येत नाही. या गंभीर समस्येकडे शासन व प्रशासन लक्ष देऊन परिचारिका यांना मुख्यालयी राहून सेवा देण्यात यावी. या निवेदनात गावकर्यांनी म्हटले आहे.
या परिसरात विद्युतची फार मोठी समस्या असून दर पाच, दहा मिनिटात तळ्यात, मळ्यात होत असतो. पावळ्यात तर आठ ते दहा, दहा दिवस लाईट येत नसतो. साप, विंचू चावून दगावण्याची शक्यता नाकारता येत नाही. या बद्दलसुद्धा अनेकदा विद्युत विभागाला तोंडी व लेखी निवेदन देऊन सुद्धा जाणूनबुजून तर दुर्लक्ष करीत नाही ना असा सवाल सर्वसामान्य नागरिकांना सतवत आहे आणि लाईनमॅनला फोन केल तर उचलत नाहीत आणि या परिसरात कधी तोंड सुद्धा दाखवत सुद्धा नाही.
या ठिकाणी अंगणवाडी असून लहान, लहान मुले शिकले जातात परंतु या ठिकाणी अगंणवाडी सेविका मुख्यालयी न राहता राजाराम वरुन ये-जा करीत असतात. या ठिकाणचा अगंणवाडी केंद्र फक्त मदतनीस चालवत असतात. या गंभीर समस्ये बद्दल बालकल्याण अधिकारी यांना जाऊन अनेकदा निवेदन दिल परंतु कारवाई मात्र शून्य दिसत आहे.
या छोटे छोटे समस्याकडे शासनानी व प्रशासनानी लक्ष देऊन जातीने समस्या सोडवावा असे गावातील पाटील दामा गावडे, ग्रामपंचायत सदस्य, इरफा गावडे, प्रतिष्ठित नागरिक गिल्ला गावडे, बिचु गावडे, मनोज गावडे, काट्टा आत्राम, साधू गावडे, रामा गावडे, रैनू गावडे, चिंना गावडे, सातू गावडे, दस्सा गावडे, बिचू गावडे, झुरु गावडे, राजु गावडे, इत्यादी गावातील नागरिक अहेरी माजी पंचायत समितीचे सभापती भास्कर तलांडे यांच्या मार्फत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा कृषी बाजार समितीचे अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांना निवेदन देण्यात आले आहे.
राज शिर्के मुंबई महानगर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल…
*कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीय बौध्द महासभेचे अध्यक्ष आयु, किशोर तेलतुंबडे यांचे प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार* सौ.…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- भारतीय बौद्ध महासभा तालुका…
उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- येथून एक खळबळजनक घटना समोर…
प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि.16:- माजी राष्ट्रपती डॉ.…
विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- दि.14 ऑक्टोबर 2024 सोमवार…