प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि.7:- जिल्ह्यात सहकारचा पाया भक्कम आहे. बंद पडलेल्या सहकारी बँकेला गत वैभव प्राप्त करण्यासाठी जिल्ह्यातील सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची वाटचाल अधोगती ते प्रगतीच्या दिशेने सुरू झाली आहे. बँकेच्या कर्ज परतफेडीबाबत असलेल्या अनास्थेमुळे बँक बुडते. त्यामुळे कर्जदारांनी बँकेने दिलेल्या कर्जाची नियमित परतफेड करण्याचे आवाहन सहकार विभागाचे अपर मुख्य सचिव अनुप कुमार यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात आज वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत प्रातिनिधिक स्वरूपात पीक कर्ज वाटपाचा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी सहकार आयुक्त व निबंधक दिपक तावरे, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, सहाय्यक जिल्हाधिकारी रेवैयाह डोंगरे, सहकारी संस्थाचे अपर निबंधक शैलेश कोतमिरे, सेवानिवृत अपर आयुक्त एस. बी. पाटील, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे कार्यकारी संचालक दिलीप दिघे, अपर निबंधक तथा सहसचिव संतोष पाटील, नागपूर विभागाचे सहनिबंधक प्रविण वानखेडे, वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे प्रशासक राजेंद्र कौसडीकर यांची उपस्थिती होती.
श्री. अनुप कुमार पुढे म्हणाले, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी आज विशेष दिवस आहे. बारा वर्षानंतर पुन्हा बँकेमार्फत शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप होत आहे. बंद पडलेल्या बँकेला पुनरुज्जीवन प्राप्त झाले असून इतर जिल्ह्यात बंद असलेल्या सहकारी बँकाना सुरू करण्यासाठी वर्धा मॉडेल राबविण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हाधिकारी श्री. कर्डिले म्हणाले, प्रामुख्याने आपला जिल्हा कृषीप्रधान आहे. जिल्हात खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. शेतकऱ्यांसाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जीवनवाहीनी म्हणून काम करते. बँक जरी सुरू झाली असली तरी स्पर्धेच्या युगात मोठी आव्हाने बँकेपुढे आहेत. त्यासाठी पुरेपूर प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.
सहकार आयुक्त व निबंधक दिपक तावरे म्हणाले, बँकेमार्फत कर्ज वाटप ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. परंतु, बारा वर्षापासून बंद असलेल शेतकऱ्यांना कर्ज वाटप सुरू झाले हा अत्यंत महत्वाचा दिवस बँकेसाठी आहे. सहकार क्षेत्रातील बँकांना अडचणीच्या काळात सभासद, ठेवीदार, खातेदार तसेच सर्वांनी सहकार्य करणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे कार्यकारी संचालक दिलीप दिघे म्हणाले, वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला प्रशिक्षण, माहिती तंत्रज्ञान आदींची सोय उपलब्ध करुन देईल. तसेच महाराष्ट्र राज्य सहकारी बँक वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे पालकत्व स्विकारत असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले.
अपर निबंधक शैलेश कोतमिरे, संतोष पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी खरीप हंगामासाठी प्रातिनिधीक स्वरुपात शेतकऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते कर्ज वाटप करण्यात आले तसेच सर्वाधिक ठेव ठेवणारे ठेविदार, सहकार विभागाचे कर्मचारी, बँकपातळीवर शंभर टक्के वसुली असलेल्या संस्थांचे चेअरमन आदींचा सत्कार यावेळी करण्यात आला.
राज शिर्के मुंबई महानगर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मिरा भाईंदर:- जगाला बुद्ध धम्माशिवाय…
आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- स्थानीय चौधरी वॉर्ड हिंगणघाटचे…
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांचा हिंगणघाट येथे दौरा. अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुलगाव:- स्थानीक गुन्हे शाखा वर्धा…
उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- सेवक संघटित व संघटित आरोग्य…
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवर पोलिसांची तैनाती. हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी महाराष्ट्र…