मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- जिल्यातील अहेरी तालुक्यातील राजाराम (खां) येथील पोलीस स्टेशन हद्दीत बसविण्यात आलेले भारत सरकार निगम लिमिटेड (BSNl) व जिओ स्टॉवर शोभेची वास्तू बनून आहे.
गेल्या दोन ते तीन महिन्यापासून नेटवर्कचा समस्या कायम सुरु आहे, मोबाईल धारकांना नेटवर्कमुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे. कधी-कधी फोन लागतात तर मध्येच फोन कट होतात. बीएसएनएल कंपनी फक्त मोबाईल धारकांची पैसे लुटण्यासाठी स्टावर उभारण्यात आले की, काय असे मोबाईल धारकांकडून ऐकायला मिळत आहे.
यावेळी बीएसएनएल चा डाटा चालनेही कठीण झाले आहे. बीएसएनएल चा डाटाचे पैसे पाण्यात गेल्या सारखे जात आहेत. वरिष्ठ अधिकारी लक्ष देऊन तात्काळ बीएसएनएल व जिओ स्टॉवर दुरुस्ती करण्यात यावे अशी मागणी. राजाराम, खांदला, पत्तीगांव कोत्तागुडम, चिरेपल्ली, मरनेल्ली, रायगट्टा, सूर्यपल्ली, कोंकापल्ली या गावातील नागरिकांनी केली आहे.
या भागात अनेक गावे येत असून या भागात बीएसएनएल व जिओ नेटवर्कचा समस्या सातत्याने उद्भबवत आहे. वरील समस्या लक्षात घेऊन सुरळीत करावे. अन्यता काही दिवसात आंदोलन करू असे अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर तलांडे यांनी प्रसिद्धी पत्रकातून केली आहे.
देवेंद्र सिरसाट हिंगणा तालुका नागपूर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री…
मानवेल शेळके नाशिक जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नाशिक:- येथून एक खळबळजनक घटना…
* सरकारच्या अपयशाचा मांडणार लेखाजोखा* मधुकर गोंगले,गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.मो. नं.9420751809 गडचिरोली :: गडचिरोली जिल्हा काँग्रेस…
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक: 17 सप्टेंबर 2024 रोज…
खासदार अमर काळे, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या उपस्थितीत केला राष्ट्रवादित पक्ष प्रवेश. मुकेश चौधरी…