मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- आज काल थोडे फार रोड बनवले आणि नाल्या बनवल्या की कुणी पण स्वतःला कार्यसम्राट विकास पुरुष म्हणून मिळवायला लागतो आणि नागरिकाच्या हिताचा मुख्य प्रश्न तसाच ताटकाळत ठेऊन त्याकडे दुर्लक्ष करतो आणि निवडणूक जवळ आली की परत तो मुद्दा उकरून काढून त्यावर आपली राजकीय पोळी भाजतो. आणि नागरिक पण अशा राजकीय नेत्यांच्या भुलथापाना बळी पळून परत त्यांनाच मतदान करत असतात हे मागील अनेक लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत दिसून येत आहे.
हिंगणघाट तालुक्यातील आजनसरा बॅरेज प्रकल्प हा तालुक्यातील एक महत्वपूर्ण प्रकल्प आहे. पण मागील 24 वर्षा पासून तो लटकला असल्याने या परिसरातील गांवकरी यांच्यात मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त करण्यात येत आहे. अशाच संताप या लोकसभा निवडणुकीत दिसून आला आणि विद्यमान खासदार यांनी घरचा रस्ता दाखवला. आजनसरा बॅरेज प्रकल्पामुळे विद्यमान आमदार यांना पण धोक्याची घंटा तर नाही ना अशी चर्चा संपूर्ण तालुक्यात सुरू आहे.
शासनाने १३ एप्रिल २००० मध्ये या प्रकल्पाकरिता १५८ कोटी २१ लाखांची मूळ प्रशासकीय मान्यता दिली होती. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते आणि विधानसभेचे तत्कालीन उपाध्यक्ष प्रमोद शेंडे यांच्या अध्यक्षतेखाली ६ एप्रिल २००१ रोजी या प्रकल्पाचे भूमिपूजन झाले. परंतु पाच वर्षे पर्यंत निधीअभावी कामाला सुरुवात झाली नसल्याने नव्याने प्रशासकीय मान्यता घेण्याची नामुष्की ओढवली होती. परत २००६ मध्ये २०८ कोटी ४२ लाख २७ हजार रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती.
ना कामाला सुरुवात ना सिंचनाचा लाभ :
वीस वर्षांपासून केवळ आश्वासनाचे गाजर दाखविले जात आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी शेतापर्यंत पाणी पोहोचविण्या साठी जिल्ह्यामध्ये अनेक प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. यातील बरेच प्रकल्प अनेक वर्षे खितपत पडल्या मुळे पूर्णत्वास गेलेले नाहीत. आणि अद्यापही या प्रकल्पाची एक वीट ही रचल्या गेली नाही, ही आजपर्यंतची वस्तू स्थिती आहे. परिणामी या प्रकल्पाची किंमत ८६० कोटींवर पोहोचली असून हा प्रकल्प होणार नाहीच, अशीच समजूत परिसरातील शेतकऱ्यांची झालेली आहे.
हिंगणघाट तालुक्यातील कोरडवाहू जमीन ओलिताखाली यावी म्हणून शासनाने १३ एप्रिल २००० मध्ये या प्रकल्पा करिता प्रशासकीय मान्यता दिली होती. प्रकल्पामध्ये २२.२४ द.ल.घ.मी. पाणी साठविले जाणार असून सिंचन क्षमता २८ हजार ८० हेक्टर आहे. हा आजनसरा बॅरेज प्रकल्प दोन दशकापासून रखडलेला आहे. हिंगणघाट तालुक्यातील ४० गावे तर चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यातील ८ गावांचे सिंचन यामध्ये समाविष्ट आहे. या प्रकल्पामुळे १ हजार ८१.३८ हेक्टर जमीन पाण्याखाली जाणार असल्याने शेतकऱ्यांच्या जमिनीचे खरेदी-विक्रीचे अधिकार गोठविण्यात आले होते. परंतु प्रकल्पाचे कामच रखडल्याने शेतकऱ्या समोर मोठा आर्थिक प्रश्न निर्माण झाला. आर्थिक अडचणींमुळे उपचाराअभावी काही शेतकऱ्यांना आपला जीवही गमवावा लागला. अनेकांच्या मुलांच्या शिक्षणासह विवाहाचा प्रश्न गंभीर झाला होता. यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलनाच्या माध्यमातून हक्क मिळवून शेतजमिनी कसायला सुुरुवात केली.
आमदार कुणावार कडून ही अपेक्षा भंग या वीस वर्षांच्या काळात अनेक मंत्री या प्रकल्पाला भेट देऊन गेलेत. त्यांनी वेळोवेळी हा प्रकल्प तत्काळ पूर्ण केला जाईल, असे आश्वासन दिले, पण आता दोन दशक उलटले तरी कामाला सुरुवात झाली नाही. त्यात ०२ आक्तोंबर २०२३ ला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ०२ महीन्यात आजनसरा बैरेज चे टेंडर निघणार असल्याची घोषणा केली होती. पण काहीच झाले नाही. शेतकरी विचारतं आहे की हा चुनावी जुमला तर नव्हता ना?
देवेंद्र सिरसाट हिंगणा तालुका नागपूर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री…
मानवेल शेळके नाशिक जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नाशिक:- येथून एक खळबळजनक घटना…
* सरकारच्या अपयशाचा मांडणार लेखाजोखा* मधुकर गोंगले,गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.मो. नं.9420751809 गडचिरोली :: गडचिरोली जिल्हा काँग्रेस…
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक: 17 सप्टेंबर 2024 रोज…
खासदार अमर काळे, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या उपस्थितीत केला राष्ट्रवादित पक्ष प्रवेश. मुकेश चौधरी…