रविंद्र भदर्गे, जालना जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन जालना:- आधीच सोयाबीनचा पेरा या भागात कमी असून पिकावर अळ्यांचा प्रादुर्भाव झाल्याने सोयाबीन पीक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. कमी अधिक प्रमाणात शेतकऱ्यांचा हंगाम वाया जाऊ नये म्हणून सोयाबीनची पेरणी केली. त्यावरही अळ्यांचा प्रादुर्भाव झाल्याने सोयाबीनचे पीक नष्ट झाल्यास शेतकरी पुरता उद्ध्वस्त होऊ शकतो. सोयाबीनवर आता अळ्या दिसत आहेत. सोयाबीनच्या झाडांची पाने अळ्या खात असल्यामुळे सोयाबीन पीक नष्ट होण्याच्या भीतीने शेतकऱ्यांना ग्रासले आहे. या अळ्यांचा बंदोबस्त लावण्यासाठी महागड्या औषधांची फवारणी करून पीक वाचविण्याच्या प्रयत्नात शेतकरी दिसून येतात.
जालना जिल्ह्यातील शेतकर्यांचे प्रामुख्याने नगदी पिक म्हणून संपूर्ण जालना जिल्ह्यातील शेतकरी सोयाबीन हे पीक जास्त प्रमाणात पेरणी करतात. या वर्षी वेळेवर व समाधान कारक पाऊस पडल्याने शेतकरी वर्ग आनंदी होता. परंतु सततच्या पावसामुळे शेतकर्यासमोर मोठ संकट निर्माण झाले आहे. शेतकर्यांच्या सोयाबीन वर मोठया प्रमाणात आळीचा प्रादुरभाव झाला. आहे त्यामुळे शेतकर्यांनी तज्ञानच मार्गदर्शन घेऊन आपल्या शेतातील होनारी नुकसान टाळावी. जर शेतकर्यांनी योग्य ती काळजी घेतली नाही तर शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते.
देवेंद्र सिरसाट हिंगणा तालुका नागपूर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री…
मानवेल शेळके नाशिक जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नाशिक:- येथून एक खळबळजनक घटना…
* सरकारच्या अपयशाचा मांडणार लेखाजोखा* मधुकर गोंगले,गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.मो. नं.9420751809 गडचिरोली :: गडचिरोली जिल्हा काँग्रेस…
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक: 17 सप्टेंबर 2024 रोज…
खासदार अमर काळे, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या उपस्थितीत केला राष्ट्रवादित पक्ष प्रवेश. मुकेश चौधरी…