ऑफलाईन पद्धतीने राशन वितरण करण्याचीही केली मागणी.
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- मोदी सरकार डिजिटल इंडिया चा नारा देत, प्रत्येक योजना ऑनलाईन पद्धतीने राबविण्याचा प्रयत्न करीत आहे, मात्र गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्रातील बहुतांश भागात अद्यापही नेटवर्क चे जाळे पोहचू शकले नाही. इंटरनेट च्या शोधात नागरिकांना कोसो दूर जावा लागत असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अन्नसुरक्षा कायद्याअंतर्गत लोकांना राशन वाटप करण्यात येते, त्यासाठी लोकांच्या बोटांचे अंगठे स्कॅन केल्या जाते त्याकरिता सुद्धा इंटरनेट चा वापर होते मात्र विस्कळीत झालेल्या इंटरनेट च्या सुविधेमुळे राशनदुकानदार राशन वाटप करू शकत नसल्याने, याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना आणि राशन दुकानदारांना सुद्धा बसत आहे व अनेक नागरिक राशन घेण्यापासून वंचित राहत असल्याने ऑफलाईन पद्धतीने राशन वितरीत करण्याची मुभा देण्यात यावी.
नेटवर्क च्या समस्यामुळे रुग्णांना वेळीच सुविधा उपलब्ध होऊ न शकल्याने 18 किमी खाटेवर बसवून दवाखान्यात न्यावे लागत आहे अस्या बऱ्याच समस्या इंटरनेट च्या अभावामुळे होत असून गडचिरोली -चिमूर लोकसभा क्षेत्रात इंटरनेट चे जाळे प्रथम प्रधान्याने मजबूत करण्याची मागणी खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी लोकसभा अध्यक्ष यांच्या माध्यमातून दुरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधीया यांच्या कडे केली आहे.
देवेंद्र सिरसाट हिंगणा तालुका नागपूर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री…
मानवेल शेळके नाशिक जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नाशिक:- येथून एक खळबळजनक घटना…
* सरकारच्या अपयशाचा मांडणार लेखाजोखा* मधुकर गोंगले,गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.मो. नं.9420751809 गडचिरोली :: गडचिरोली जिल्हा काँग्रेस…
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक: 17 सप्टेंबर 2024 रोज…
खासदार अमर काळे, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या उपस्थितीत केला राष्ट्रवादित पक्ष प्रवेश. मुकेश चौधरी…