प्रशांत जगताप विशेष प्रतिनिधी
कर्नाटक:- येथून एक अनोखी बातमी समोर येत आहे. 30 वर्षापूर्वीचं निधन झालेल्या एका वर वधूचा विवाह सोहळा नुसताच रीती रिवाजा नुसार मोठ्या धुमधडाक्यात पार पडला आहे.
ही अनोखी घटना आहे कर्नाटक मधील, तुम्हाला आश्चर्याने एकच प्रश्न पडेल, 30 वर्षा पूर्वी मयत झालेल्या वर आणि वधुच लग्न हे कसं शक्य आहे. पण हे खरंय आणि हि एक कर्नाटक राज्यातील प्रथा आहे. दक्षिणा कन्नडा या प्रथेनुसार ज्या नवजात बालकांचा जन्मादरम्यान मृत्यू होतो त्या बालकाचं दुसऱ्या नवजात मृत बालकाशी लग्न लावल्या जातं. मृत नवजाताच्या मृत्यूच्या 25 ते 30 वर्षानंतर म्हणजे ते तरुण्यवस्थेत आल्यानंतर त्यांचा विवाह सोहळा मोठ्या धुमधडाक्यात पार पाडला जातो.
विशेष म्हणजे या लग्न सोहळ्यास वधु वर स्वतः हा उपस्थित नसले तरी त्यांच्या परिवारातील लोक, गावकरी मोठ्या प्रमाणावर उपस्थित असतात आणि अगदी वधू वर हयात असल्यासारखे विवाह सोहळा पार पडतो. यात एक विशेष अट आहे ती म्हणजे या या विवाह सोहळ्यात लहान मुलांना प्रवेश नसतो.
भारत हा देश पूर्वी पासून अनेक प्रथा, परंपरा, रूढीने भरलेला देश आहे. आज आपण 21 व्या शतकात असलो तरी अशा परंपरा समोर चालवत आहों. 2 मृतकांचे लग्न ही बाब जरा धक्कादायक आणि चिंताजनक वाटत असली तरी हा परंपरेचा एक भाग आहे. त्यामुळे आजही ही प्रथा मोठ्या प्रमाणावर जपली जात आहे.
राज शिर्के मुंबई महानगर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल…
*कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीय बौध्द महासभेचे अध्यक्ष आयु, किशोर तेलतुंबडे यांचे प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार* सौ.…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- भारतीय बौद्ध महासभा तालुका…
उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- येथून एक खळबळजनक घटना समोर…
प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि.16:- माजी राष्ट्रपती डॉ.…
विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- दि.14 ऑक्टोबर 2024 सोमवार…