आशिष अबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
मो.8888630841
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- ‘अब की बार किसान सरकार’चा नारा देत भारत राष्ट्र समिती या आपल्या पक्षाचा विस्तार संपूर्ण महाराष्ट्र राज्यात करण्याची घोषणा तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी केली होती. भारत राष्ट्र समिती राज्यातील निवडणुका पूर्ण ताकदीने लढण्याचा निर्णय पक्षाने घेतला असून, हिंगणघाट तालुक्यात डॉ. उमेश वावरे याच्या नेतृत्वात मोठ्या प्रमाणात पक्ष बांधणी सुरू आहे.
त्यात जुनोना येथील आबाजी महाराज देवस्थान येथे भारत राष्ट्र समितीच्या वतीने सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला ग्रामस्थानी चांगला प्रतिसात दिला. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. उमेश वावरे म्हणाले की, गेला 75 वर्षात वेग वेगळा पक्षाचे सरकार आले तरी ही शेतकरी आत्महत्या करीत आहे, या मध्ये बद्दल घडवायाच्या असेल तर भारत राष्ट्र समिति पक्ष गेला 9 वर्षा पासून तेंलगणा सरकार शेतकऱ्या साठी काम करत आहे. तेलंगणा राज्यात शेतकऱ्यासाठी योजना कशा राबवतात याकडे शेकऱ्यानी लक्ष दिले पाहीजे, 9 वर्षात तेंलगणा मध्ये एक ही आत्महत्या केली नाही जे तेंलगणात होऊ शकते ते महाराष्ट्र का नाही त्यामुळे नागरिकानी व शेतकऱ्यानी सुध्दा बिआरएस पार्टीत सामील होऊन महाराष्ट्रात शेतकरी सरकार
स्थापन करण्यास पुढाकार घ्यावा असे आव्हान या वेळी करण्यात आले.
सदर सभेला मनीष कांबळे, चारू आटे, चंदु बाहाडे, ईश्वर जगदीश गिरी (माजी संरपच), अरूण गावडे (माजी संरपच), विनायक भोगे, वासुदेव गोडे, गजानन भिजवायें, पिन्टु बीजवार, रमेश बुटे, रमेश बोरे, मनोज चौधरी, मारोती चौधरी, हरिभाऊ घोडे, दिवाकर पोथारे, दशरथ ईस्टुलकर, ईश्वर गावडे, नारायण गोडे, केशव बाळशराफ, बाबु बाळसराफ, नारायण गावडे, अरूण गावडे, तानाजी घोडे, राजु बाहाडे आदि मान्यवर व कार्यकर्ता उपस्थिति होते.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 97666445348/7385445384