माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी अहेरीचे आगार प्रमुख घागरगुंडे, विभागीय नियंत्रक तसेच विभागीय वाहातूक अधिकारी यांचे सोबत चर्चा करून तोळगा काढण्यास सांगितले.
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- काही दिवसापूर्वी शाळा सुरू झाल्या आहेत, अहेरी तालुक्यातील अनेक गावे, खेडय़ांमध्ये माध्यमिक, महाविद्यालयीन शिक्षणाच्या सुविधा नसल्याने येथील विद्यार्थी एसटी बसने तालुका मुख्यालयी ये-जा करून शिक्षण घेत आहेत. मात्र त्यांच्या प्रवासासाठी आवश्यक तेवढय़ा बसफेऱ्या नसल्याने व शालेय वेळेवर नसल्याने मोठा मनस्ताप विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे. बस अभावी शेकडो विद्यार्थी होतील ‘शाळाबाह्य’ होनाची भीती निर्माण झाली आहे
अहेरी तालुक्यातील आलापल्ली ते आष्टी रस्त्यावर वसलेल्या खमनचेरू, बोरी,राजपुर, शिवनीपाठ, जामगाव, टिकेपली, धन्नूर, धमपूर, चौडमपली चंदनकेळी आदि गावात बस सेवा वेळेवर मिळत नसल्याने शालेय विद्यार्थ्यांना व नागरिकांना शाळेत पोहचण्यासाठी उशीर झाल्यास विध्यार्थ्यांचे भविष्य अंधारात जाणार असे पालक वर्गाचें मनने आहे तर महामंडळ आगार प्रमुख यांचे म्हणने आहे की आम्ही बसेस वेळेवर सोडतो परंतु सुरजागडच्या जड़ वाहतुकीमुळे रस्त्यांवर गाड्या उभे राहतात त्यामुळे बसेस विद्यार्थ्यांच्या शालेय वेळेवर पोहोचू शकत नाही असे सांगितले.
त्यामुळे आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व मा. जि. प.अध्यक्ष तथा अहेरी कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजय कंकडालवार यांनी विभागीय नियंत्रक व विभागीय वाहतूक अधिकारी यांच्या सोबत भ्रमणध्वनी वरून संपर्क करून त्वरीत तोडगा असे सूचना दिले. यावेळी उपस्थित अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार, नरेंद्र गर्गम, प्रकाश दुर्गे, विनोद रामटेके, राकेश सडमेकसह आविसं व अजयभाऊ मित्र परिवारचे पदाधीकारी कार्यकर्ते तसेच आगारातील कर्मचारी उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348