रविंद्र भदर्गे, जालना उपजिल्हा प्रतिनिधि
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन जालना:- परतूर तालुका येथील परिसर परतूर शहरात अनेक एक ठिकाणी कचराचे साम्राज्य साठवून नाल्या तुंबल्याने घाण पाणी रस्त्यावर रहदारी करणाऱ्या अनेक नागरिकांना वयोवृद्ध लहान मुलांना दुर्गंधीमुळे त्यांचे आरोग्य धोक्यात दिसत असल्याचे चित्र मलंग शहा मस्जिद धार्मिक स्थळा ठिकाणी घाण पाणी रस्त्यावर येऊन नागरिकांना रहदारीचा मोठा अडथळा होत आहे. नमाज पठण करण्यासाठी स्वच्छता हवी असली पाहिजे येथील नागरिकांचे म्हणणे पालिकेने याकडे सर्रास दुर्लक्ष केल्याचे चित्र येथे दिसून येत आहे.
तीन ते चार महिन्यापासून नाली उपसण्याचे काम पालिका प्रशासन करत नसल्याचे चित्र येथे दिसून आले आहे घंटागाडी येत असल्यामुळे नागरिक त्याकडे दुर्लक्ष करत कचरा घंटागाडीत न टाकता नाल्यामध्ये आपल्या घराच्या बाजूला साठवून ठेवून ते नंतर नालीत टाकण्याचे काम येथील नागरिक करत असल्याचे चित्र दिसून येत आहे. हातपंप परिसराभोवती कचऱ्याचे ढिगार दिसून येत आहे कचरा भरून नेण्यास पालिका प्रशासन व स्वच्छता अधिकारी याकडे दुर्लक्ष करत आहे.
सध्या पाऊसाळा सुरू आहे त्यामुळे या कचऱ्यातून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात मंनस्ताप सहन करावा लागत आहे. रिमझिम पावसामुळे घराबाहेर पडणे म्हणजे तारेवरची कसरत करावी लागत आहे परंतु याकडे पालिका प्रशासन काय भूमिका घेणार आहे स्वच्छता अधिकारी म्हणून नेमलेले अधिकारी कोण आहे सर्व नेम कागदोपत्री परंतु नागरिक वय वृद्ध शाळातील मुले या दुर्गंधीने आजारी पडून शकतात. सर्वत्र परिसर घाणीच्या विळख्यात दिसत आहे याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तत्काळ लक्ष घालून स्वच्छता राखावी अशी नागरिकांची मागणी आहे.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348