निखिल पिदूरकर, कोरपणा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन कोरपणा:- तालुक्यात कालपासून धो-धो पडणाऱ्या पावसामुळे पैनगंगा नदीने धोकायची पातळी ओलांडली असून इरई बोरगाव येथील अनेक शेत पाण्याखाली गेले असून शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. तालुक्यात दिवसभर जोरदार पाऊस पडल्यास मोठी पुरपरिस्थीती निर्माण होऊन
शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले असून इरई बोरगांव येथील नागरिकाच्या समस्या जाणून संबंधित अधिकारी याच्याशी दूरध्वनी वरून संपर्क करुन नागरिकांच्या आणि शेतकऱ्याच्या समस्याची तात्काळ गंभीर दखल घ्यावी व नागरिकांच्या समस्या मार्गी लावाव्या अशी मागणी करण्यात आली.
या पुरपरिस्थीतीची पाहणी भारतीय युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष आशिष भाऊ ताजने कोरपणा तालुक्यातील निराधार समितीचे सदस्य निखिल भोंगळ यांनी केली असुन इरई येथील राहुल पायघन, युवा पत्रकार निखिल पिदूरकर, राजेंद्र वरारकर, स्वप्नील वरारकर, प्रभाकर जुमनाके, रवींद्र आत्राम व गावकरी यावेळी उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348