मातंग समाजाने शिक्षणाकडे लक्ष देणे ही काळाची गरज अतुल वांदिले प्रदेश सरचिटणीस रा. काँ पार्टी
प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- साहित्यकार लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हा मोठा ठेवा आहे. पीडित, शोषित, उपेक्षितांचे प्रश्न त्यांनी साहित्यातून मांडले. कमी शिक्षण असुनही कथा, कादंबरी, पोवाडे, शाहिरीच्या माध्यमातून प्रबोधन केले. त्यांच्या साहित्यातून लोकांना जगण्याचे बळ मिळते आहे. म्हणून नैराश्य झटकून विद्यार्थ्यांनी सुशिक्षित, सुसंस्कृत व्हा.
साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांचे कमी शिक्षण असुनही कथा, कादंबरी, पोवाडे, शाहिरीच्या माध्यमातून प्रबोधन केले. “हे मानावा तू गुलाम नाहीस, तू या वास्तव जगाचा निर्माता आहेस” साहित्यरत्न लोकशाहीर यांच्या जीवनावरील प्रकाश टाकत आपले मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी व्यक्त केले. लोकशाहीर अन्नाभाऊ साठे यांच्या जयंती कार्यक्रमाचे आयोजन वाघोली येथे करण्यात आले होते. त्यावेळेस ते बोलत होते.
या कार्यक्रमाची सुरुवात अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला माल्यार्पण अर्पण करून करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटक माजी जिल्हा परिषद सदस्य शरद शहारे, प्रमोद नौकरकर, जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, ग्रामपंचायत सदस्या गिरजा बावणे, विजू नौकरकर,विनोदराव गोटे, मुख्याध्यापक गिरीश परटक्के, रामू वासेकर, किशोर चांभारे मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन महेश मुडे यांनी केले तर आभार गिरिश परटक्के सर यांनी केले.
यावेळी आकाश बावणे, प्रदीप बावने, ज्ञानेश्वर बावणे, संदीप बावणे, भोला बावणे, शंकर बावणे, भास्कर काळे,पुंडलिक वानखेडे, मनोज कळने, अविनाश बावणे यांच्यासह मोठ्या संख्येने मातंग समाजातील नागरिक उपस्थित होते.