राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस ‘अतुल वांदिले’ यांनी दुरुस्ती कामाच्या पुलाची केली पाहणी.
प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- नजिकच्या सुल्तानपूर गावाजवळील जुना पूल काही वर्षांपासून काही प्रमाणात खचलेला होता. परंतु या आठवड्यात सतत च्या मुसळधार पावसामुळे हा पूर्ण पूल पूर्णपणे खचून गेला. याबाबद प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांचा मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने व गावकऱ्यांनी तहसीलदार यांना निवेदन दिले होते. या निवेदनात आंदोलनाचा देखील ईशारा देण्यात आला होता. परंतु शासनाने यांची दखल घेऊन पुलाच्या दुरुस्तीला तात्काळ सुरुवात केली.
सतत मुसळधार पावसाने हा नादुरुस्त पूल पूर्णरित्या खचून गेलेला होता. या पुलावरून ये- जा करिता गावातील लोकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. आता या पुलाचे दुरुस्ती सुरू असून येत्या काही दिवसात या पूल सुरळीत सुरू होईल. या काम सुरू असलेल्या पुलाची पाहणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस ‘अतुल वांदिले’ यांनी केली.
पाहणी करता वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्यासह जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, सुनील भुते, रवीकिरण कुटे, श्रीराम डाहाने, विजय भगत, शांताराम चिंचुलकर, अवकाश भगत, अजय आटोडे, लक्ष्मण भगत, विलास आटोडे, पर्मेश्वर् भगत, परसराम निशाने, प्रज्वल भगत, कान्हा भगत, सुनंदा भोयर व गावातील नागरिक उपस्थित होते.