हनिशा दुधे, चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर :- जिल्हातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. वरोरा पोलीस स्टेशनमध्ये एका बलात्कार पिढीत दलीत महिलेने पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या सहायक पोलीस निरीक्षक निलेश चौरे यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी पोलीस स्टेशनमध्येच विष घेतल्याची घटना घडली आहे. ही घटना समोर येताच संपूर्ण जिल्हात एकच खळबळ माजली आहे.
36 वर्षीय महिला बरोबर ऑक्टोबर 2022 मध्ये नराधम आरोपी इरफान शेख विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. आरोपीवर 376 आणि ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून अटक झाली होती. मात्र या प्रकरणात आरोपीला जामीन मिळाल्यावर आरोपी आणि त्याचे नातलग त्रास देत असल्याचा पीडित महिलेचा आरोप होता. सोबतच आरोपींना वरोरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक निलेश चौरे मदत करत असल्याचा देखील महिलेने आरोप केला होता, आरोपींना मदत करणाऱ्या सहायक पोलीस निरीक्षक निलेश चौरे यांच्यावर कारवाई करण्याची महिलेने शनिवारी वरोरा येथे पत्रकार परिषदेत मागणी केली होती. मात्र सहाय्यक पोलिस निरीक्षक चौरे यांच्यावर कारवाई न झाल्याने महिलेने वरोरा पोलीस स्टेशन मध्ये विष घेतले. त्यामुळे पोलीस स्टेशन येथे एकच खळबळ माजली होती. या महिलेला प्रथम वरोरा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यानंतर चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आलं आहे.
काय आहे प्रकरण…
दरम्यान, 22 जून रोजी आरोपीच्या नातेवाईकांनी पीडितेला गावातील चौकात सर्वांसमोर अर्धनग्न अवस्थेत बेदम मारहाण केली होते. फाटक्या कपड्यांसह वरोरा पोलिस ठाण्यात तक्रार देण्याचा प्रयत्न केला, मात्र तक्रार घेण्याऐवजी तेथे तैनात सहायक पोलिस निरीक्षक चवरे यांनी शिवीगाळ केली. पीडितेचे म्हणणे आहे की, वरोरा पोलिस ठाण्यातून सहकार्य न मिळाल्याने तिने थेट नागपुरात जाऊन विशेष पोलिस महानिरीक्षकांकडे तक्रार केली, त्यांच्या सूचनेवरून वरोरा पोलिसांनी अखेर ९ जुलै रोजी अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केला. शेख रिजवान, शेख मौसीम, शेख दानिश आणि शेख मोहम्मद यांचा समावेश आहे.
अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होऊन एक महिना झाला तरी पोलिसांनी आरोपींना अटक केली नसल्याचा आरोप पीडितेने केला आहे, आरोपी वरोरा पोलीस स्टेशनचे एपीआय चावरे यांचे निकटवर्तीय असल्याचा आरोप पीडितेने केला आहे.त्यामुळे ते अटक करण्यास टाळाटाळ करत आहेत. आरोपी या आरोपींपासून आपल्या जीवाला धोका असल्याचे त्याने सांगितले. आठवडाभरात आरोपींना अटक न केल्यास जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर विष पिऊन आत्महत्या करणार असून, त्यासाठी आरोपी आणि त्यांना वाचविण्याचा प्रयत्न करणारे एपीआय जबाबदार राहणार असल्याचे तिने म्हटले होते.

