आदी संस्कृती व क्रांतिकारी विचार हेच देशाला बलवान बनवू शकते -प्रदीपकुमार नागपुरकर
मुकेश चौधरी, कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- भारतीय युवा संस्कार परीषद व राष्ट्रीय स्वाभिमान आंदोलन यांच्या संयुक्त विद्यमाने ज्युपिटर अकादमी नंदोरी चौक येथे जागतिक आदिवासी व राष्ट्रीय युवा क्रांती दिन कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी प्रमुख वक्ते म्हणून बोलतांना प्रदीपकुमार नागपुरकर म्हणाले की आपल्या भारतीय समाज व्यवस्थेची आदी कालखंडापासून संस्कृती जपण्याचा आदिवासी जनसमुहाने केलेला अथक प्रयत्न त्यामुळेच डोंगर कपा-यात छुपे युद्ध व देशभक्ती ही आपली संस्कृती सांभाळून यावर कुणीही आपला हक्क सांगू नये हा बिरसा मुंडाचा ईतिहास आपण आठवला पाहिजे तसेच महात्मा गांधी यांनी इग्रेजो भारत छोडो हा नारा देऊन युवा नवतरुणाईला देशाभिमानी कार्यात इंग्रजी राजवटीच्या विरुद्ध बिगूल फुंकून हा देश स्वातंत्र्य करण्यासाठी महत्वपूर्ण योग ही आँगस्ट क्रांती ठरली, तेव्हा आदी संस्कृती व क्रांतिकारक विचारचं हे देश बलवान ठेवण्यासाठी आवश्यक ठरते असे मत नागपुरकर यांनी परखडपणे मांडले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भायुसं परीषदेच्या संरक्षक डॉ. प्रा. उषाताई साजापुरकर, प्रमुख वक्ते म्हणून राष्ट्रीय स्वाभिमान आंदोलनाचे राष्ट्रीय सचिव प्रदीपकुमार नागपुरकर, प्रमुख अतिथी सामाजिक कार्यकर्ते दामोधर वानखेडे, रिपाइंचे मोतीराम मुन, भा.यु.सं.परीषदेचे अंकुश बावणे आदी मान्यवर मंचासीन होते.
या कार्यक्रमाच्या सुरवातीला भारतमाता, बिरसा मुंडा, महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करुन दीप प्रज्वलीत करण्यात आले. तर मान्यवरांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. या प्रसंगी दिमोधर वानखडे व मोतीराम मुन यांनी आदिवासी दिवसाचे महत्व आणि कार्य आपल्या भाषणातून सांगितले. अध्यक्षीय मनोगत मांडताना डॉ. प्रा. उषाताई साजापुरकर म्हणाल्या की स्वातंत्र्य लढ्यातील आदिवासी चे बलिदान, त्याग, देशाभिमान हा संस्कृतीमय संरक्षणासाठी एक मोलाचा वारसा जपल्याने महात्मा गांधी ने शेवटचा इंग्रजी राजवटीला इशारा देत भारत छोडो हा देशव्यापी मंत्र दिला यामुळे हा दिवस राष्ट्रीय युवा क्रांतिकारी सुवर्ण अक्षराचा झाला. माझा देश मी देशाचा शिपाई ही शपथ सुध्दा देण्यात आली.
या कार्यक्रमाचे सुत्र संचालन संयोजक अमोल भोमले गुरुजी यांनी तर आभार प्रदर्शन कु. सिध्दी कोल्हे हिने मानले, प्रसंगारुप इतिहासकार साहित्यिक प्रा.हरी नरके यांच्या निधन झाले त्यांना दोन मिनिटे मौन श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. यशस्वीतेसाठी सौ.निखीता भोमले, हर्षदा ढोकपांडे, नेत्रा आंबटकर, तेजस ढोकपांडे, नरहरी थुल, प्रिया भोमले, आशिष परचाके, अशोक येकेश्वर, अशोक भुसारी, शिवनकर, अशोक चिमुरकर, आदींचा सहभाग होता.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348