मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- भारत सरकारच्या अमृत भारत स्टेशन योजना अंतर्गत मध्य रेल्वे नागपूर यांच्या वतीने अमृत भारत स्टेशन योजना अंतर्गत शालेय विद्यार्थ्या करिता “मेरा देश बदल रहा, मेरा रेल बदल रहा” या विषयावर निबंध,चित्रकला, कविता या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात भारत विद्यालयला तीन्ही स्पर्धेत प्रथम व्दितीय व तृतीय पारितोषिक प्राप्त झाले.
यात निबंध स्पर्धेत प्रथम पुरस्कार अक्षरा राजा अनिवाळ वर्ग 10 वा, तृतीय पुरस्कार हर्षा संजय नैताम वर्ग 10 वा, कविता स्पर्धेत प्रथम पुरस्कार टिना सुनिल सोनटटके वर्ग 10 , व्दितीय पुरस्कार कृतिका निकेश सातपुते वर्ग 8 वा, तृतीय पुरस्कार राधिका राजु ढेगंळे वर्ग 7 वा तसेच चित्रकला स्पर्धेत प्रथम पुरस्कार अंबिका सुरेश वेलगंधावार वर्ग 9 वा व्दितीय पुरस्कार रोहित नितेश धोटे वर्ग 9 वा याना प्राप्त झाले तसेच अनन्या विलासराव निवटे वर्ग 7 वा, नेहा सुभाष दाते वर्ग 9 वा, मंथन चंद्रकांत सहारे वर्ग 7 वा, नक्ष दशरथ पोहाने वर्ग 6 वा याना प्रोत्साहनपर पुरस्कार प्राप्त झाले. पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्याना प्रथम, व्दितीय तृतीय व प्रोत्साहनपर पुरस्कार याना अनुक्रमे 700, 500, 300, 150 व भेट वस्तु प्रदान करण्यात आली. तसेच कला शिक्षक मिलिंद सवारकर व कु. अंजु काकडे याना सुध्दा गौरविण्यात आले.
यावेळी सर्व विजेत्याना आमदार समिर कुणवार, माजी खासदार सुरेश वाघमारे, रेल्वे अधिकारी सुभेश वर्मा याच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. या सर्व विजयी विद्यार्थ्याचे व शिक्षकांचे कौतुक प्रोग्रेसिव्ह अेज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष गोकुलदासजी राठी, सचिव रमेशराव धारकर, उपाध्यक्ष श्यामभाऊ भीमणवार संस्थचे सर्व संचालक सदस्य, मुख्याध्यापक राजु कारवटकर, उपमुख्याध्यापक हरिष भटटड, पर्यवेक्षिका प्रतिभा शंभळकर, पर्यवेक्षक विनोद नांदुरकर यानी अभिनंदन केले.