युवराज मेश्राम, विदर्भ ब्युरो चीफ (नागपुर)
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन कळमेश्वर:- तालुका मातंग समाज आणि आद्य क्रांतिगुरु लहुजी साळवे प्रबोधन मंच नागपूर यांच्या संयुक्त विद्यमानाने लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती समारोह साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन कळमेश्वरचे पोलिस निरीक्षक सोळसे यांनी केले तर, कार्यक्रमाचे अध्यक्ष महादेवजी जाधव होते. कार्यक्रमाचे मुख्यवक्ता प्रदीप बोरकर, विक्रीकर उपायुक्त वर्धा यांनी अण्णा भाऊंच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला.
यावेळी सोळसे यांनी आपल्या उद्घाटनीय अभिभाषणातून महापुरुषांच्या विचारांप्रती एकनिष्ठ राहण्याचा संदेश दिला. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक विभागीय उपायुक्त सिध्दार्थ गायकवाड यांनी समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांबाबत यथोचित मार्गदर्शन केले. रविंद्रजी नेमाडे यांनी विद्यार्थ्यांना काळाभिमुख शिक्षण घ्या असा संदेश दिला. एकजुटीचा संदेश पद्माकर बावणे यांनी दिला तर व्यावसायिक शिक्षणाचे महत्व क्रांतीचंद्र भावे यांनी सांगितले. नितीन तायवाडे यांनी युवाशक्तीचे महत्व स्पष्ट केले. भारत डोंगरे यांनी यथोचित मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला सर्वश्री सुनिल तायवाडे, बुधाजी सुरकार, गुरुदास बावणे, कावळे गुरुजी, काॅ. दिलीप तायडे, शिल्पाताई वानखेडे, गुलाब गायकवाड, बबनजी जगधने व्यासपीठावर उपस्थित होते.
या प्रसंगी ज्येष्ठ समाजसेवक अशोक भावे यांचा समाजाच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी मातंग समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि गुणवंतांचा सत्कार शेकडो समाज बांधवांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आला. या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक प्रा.राहुल हिवराळे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन वैशाली खडसे यांनी केले आणि आभार प्रदर्शन किरण वानखेडे यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नारायणजी प्रधान, वासुदेवजी भावे, दिलीप खडसे, नरेश आंबुलकर, बल्लु खडसे, सुरज बावणे, रामा तायवाडे, सारीका खोडके, सागर खडसे, रवी लोखंडे इत्यादींनी परिश्रम केले.सामुहीक भोजनानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348