आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
मोबा. 8888630841
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- 15 ऑगस्ट रोजी भारत आपला 76 वा अमृत महोत्सव साजरा केला 76 व्या स्वातंत्र्यदिना निमित्त वर्धा जिल्हा परिषदेने अभिनव उपक्रम राबवत सुंदर रांगोळी काढून उत्सव साजरा करण्यात आला. भारतात एखादा सण साजरा करायचा म्हटला आणि रांगोळी नाही. हे क्वचितच घडत असेल. समारंभाला रांगोळी काढणे ही आपली भारतीय संस्कृती आहे. रांगोळीमुळे सणात समृद्धी येते, असे मानले जाते. अशातच 15 ऑगस्ट रोजी भारत आपला 76 वा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. त्यात चार हजार चौरस फुटांची रांगोळी काढून हा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
जिल्हा क्रीडा संकुलात काढण्यात येत असलेली ही रांगोळी पाहण्यास नागरिक आतुर झाले आहेत.जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा परिषदचे मुख्यकार्यकारी अधिकारी रोहन घुगे, समन्वयक डॉ. ज्ञानदा फणसे, शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी ही रांगोळी एक आठवण म्हणून जपण्याचे आवाहन केले आहे. विद्यार्थी, नागरिक यांना ही कला पाहण्यास प्रोत्साहित केले जात आहे.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 976644548/7385445348