अर्पित वाहाणे आर्वी तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा- आष्टी(श):- आष्टी शहर १९४२ च्या स्वातंत्र्य लढ्यातील ऐतिहासिक शहीद भूमी असून नगरपंचायत क्षेत्रातील घरकुलच्या थकित अनुदानासाठी धरणे आंदोलन करणे हे केंद्र सरकारचे अपयश असून वेळ पडल्यास पुन्हा एकदा थकीत अनुदानासाठी नागपंचमी दिनी आष्टी शहरात रणसंग्राम उभा केल्या जाईल आणि त्याला जबाबदार सत्ताधारी राहील असे आर्वी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार तथा प्रदेश महासचिव अमर काळे यांनी आपले परखड मत व्यक्त केले.
ते वर्ष २०१८ सालापासून नगरपंचायत क्षेत्रातील घरकुल लाभार्थ्यांची थकीत अनुदानाची ९० हजार रुपये रक्कम केंद्र सरकारने अदा करावी यासाठी स्थानिक गोल बाजार चौकात स्वातंत्र्य दिनी केलेल्या २ तासाच्या धरणे आंदोलनात प्रमुख नेतृत्व म्हणून बोलत होते यावेळी नगराध्यक्ष अनिल धोत्रे, उपनगराध्यक्ष जनाब जाकिर हुसेन कांग्रेस तालुकाध्यक्ष रवींद्र गंजीवाले, ज्येष्ठ पदाधिकारी प्रा.अरुण बाजारे, माजी सभापती ईश्वर वरकड, माजी सभापती बेबिताई बीजवे, माजी नगराध्यक्ष मीराताई येनुरकर, माजी नगराध्यक्ष जयश्रीताई मोकदंम, माजी जि.प.सदस्य राजाभाऊ मदनकर, ता.यू.का अध्यक्ष प्रसाद वरकड, अल्पसंख्याक ता.अध्यक्ष मुमताज अहेमद, न.पं.गटनेता राहुल लाड नगरसेवक योगेंद्र पोकळे यांच्यासह असंख्य कांग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी ठाणेदार पवार मार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाद्वारे पंतप्रधानांना निवेदन पाठवण्यात आले पुढे बोलतांना आ.काळे म्हणाले की, १२ दिवसापूर्वी म्हणजे ३ ऑगस्ट रोजी भरपावसात लक्षवेधक आंदोलन करूनही केंद्रसरकारने दखल घेतली नाही म्हणूनच पुन्हा २ तासाचे आज स्वातंत्र दिनी देशात कुठेच आंदोलन होत नसतांना धरणे आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधले आहे यानंतरही केंद्र सरकारने दखल न घेतल्यास येत्या नागपंचमी दिनी आष्टीत पाहुणे म्हणून येणारे वर्धा जिल्हाधिकारी,स्थानिक आमदार,खासदार यांना निवेदन दिले जाईल यावेळी मात्र पत्थर सारे बॉम्ब बनेंगे,भक्त बनेगी सेना अशी परिस्थिती उद्भभवू शकते आष्टीच्या स्वातंत्र्यलढ्याच्या रणसंग्रामाचा दिवस नागपंचमी होता आणि आमच्याही आंदोलनाचा दिवस नागपंचमी आहे यासाठी पोलीस प्रशासनाने अतिरिक्त पोलिस कुमक तैनात ठेवावी असा कडक ईशारा देत केंद्रातील मोदी सरकारवर ताशेरे ओढतांना २०२२ सालापर्यंत प्रत्येक बेघरांना घर दिले जाईल असे खोटे आश्वासन मोदी सरकारने लोकांना दिले होते त्यात त्यांनी हर आदमी का घर होगा,घर मे नल होगा उसमे जल होगा असे म्हणत केंद्र सरकारची खिल्ली उडवत आर्थिक बजेट नसतांना घराचे आश्वासन दिलेच कसे? असे म्हणत केंद्र सरकारवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले.
यावेळी नगराध्यक्ष अनिल धोत्रे, उपनगराध्यक्ष जाकीर हुसेन यांची समायोजित भाषणे झालीत आदोलनांची सुरुवात राष्ट्रपिता महात्मा गांधी व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजनाने करण्यात आली त्यानंतर साहूर येथील भजन मंडळींनी क्रांतिकारी खंजिरी भजनाने आंदोलनात स्फूर्ती जागवली आंदोलनाचे प्रास्ताविक विपिन उमाळे संचालन जितेंद्र शेटे तर आभार प्रदर्शन प्रसाद वरकड यांनी केले तर राष्ट्रवंदनेने आंदोलनाचा समारोप झाला