मंगेश जगताप, मुंबई विक्रोळी प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचं दोन दिवसीय शिबीर शिर्डीमध्ये सुरू आहे. या शिबिरात बोलताना आमदार जितेंद्र आव्हाड यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. राम शाकाहारी नव्हता, तो मांसहारी होता. एवढी वर्ष जंगलात राहून कोणी शाकाहारी राहतं का? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी विचारला आहे. एकीकडे देशभरात अयोध्येतल्या श्रीराम मंदिराच्या लोकार्पणाची तयारी होत असताना, जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
‘राम आपला आहे, राम बहुजनांचा आहे. शिकार करून खाणारा राम, तो आमच्या बहुजनांचा आहे. तुम्ही आम्हाला शाकाहारी बनवायला जात आहात. आम्ही रामाचा आदर्श पाळतोय आणि मटण खात आहे. हा रामाचा आदर्श आहे, राम शाकाहारी नव्हताच, तो मांसहारी होता. 14 वर्ष जंगलात राहणारा माणूस शाकाहारी शोधायला कुठे जाणार?’, असं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.