भष्ट्राचारी स्वाती सूर्यवंशी सह अजून किती लोकांचे वीना सही व कागदपत्रा शिवाय खाते काढले याची आदर्श महिला नागरी सहकारी पत संस्थेची चौकशी झाली पाहिजे.
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शासकीय प्रकल्पासाठी जमिनीचे अधिग्रहण करताना झालेल्या 2 कोटी 64 लाख रुपयांच्या अपहारप्रकरणी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे परभणीच्या विद्यमान उपजिल्हाधिकारी व वर्ध्याच्या तत्कालीन भूसंपादक अधिकारी स्वाती सूर्यवंशी यांच्या विरोधात पोलिस मध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या घटनेमुळे महसूल प्रशासन वर्तुळात खळबळ उडाली होती. यापूर्वीही सूर्यवंशी यांच्या विरोधात कारवाई करण्यात आली होती, परंतु उघडकीस आलेल्या घोटाळ्याची व्यापकता पाहता अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी पोलिसांत तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला होता.
पण आता या भष्ट्राचाराची अजून व्याप्ती वाढण्याची शक्यता दिसून येत असताना हिंगणघाट येथील आदर्श महिला नागरी सहकारी पत संस्था मध्ये भष्ट्राचारी स्वाती सूर्यवंशी यांच्या वीना सहीचे खाते उघडले असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. बँकेत वीना सहीने काढण्यात आलेल्या खात्यात 1 कोटी 7 लाख 90 हजार रुपये जमा करण्यात आल्याने हिंगणघाट येथील आदर्श महिला नागरी सहकारी पत संस्थेवर मोठे प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.

याबाबत स्वतः आदर्श महीला नागरिक सहकारी पत संस्था हिंगणघाट अध्यक्ष आचल थुल यांनी याबाबत पत्रकार परिषद मध्ये विना सहीचे खाते उघडण्या बाबत स्पष्टीकरण दिले. या प्रकरणी माहिती देताना उपजिल्हाधिकारी स्वाती सुर्यवंशी यांच्या मोबाईल वरून आलेल्या संदेशा वरून चार लोकांचे बिना सहीचे खाते उघडले. व्हॉटसअप वरून आलेल्या आधार कार्ड वरून त्यांचे खाते उघडण्यात आले. पण उपजिल्हाधिकारी यांच्या एका भ्रष्टाचार प्रकरनामुळे ते चर्चेत आले. त्यावरून आदर्श महिला पत संस्थेत त्याचा सांगण्यावरून काढण्यात आलेल्या खातेदारा विषयी उलट सुलट चर्चा होऊ लागली. यावरून आचल थुल यांनी पत्रकार परिषद घेऊन वरील प्रमाणे खुलासा केला.
या पत्रकार परिषदेत त्यांनी भष्ट्राचारी उपजिल्हाधिकारी स्वाती सुर्यवंशी सोबत माझी ओळख 15 दिवसा पूर्वी पुलगावचे ठेकेदार ताटे यांनी करुण दिल्याची माहिती दिली. पत्रकार परिषदेत आचल थुल यानी सांगितले की माझ्या मोबाईल वर त्या भष्ट्राचारी उपजिल्हाधिकारी स्वाती सुर्यवंशी यानी वॉटसअप वर लाभार्थीचे आधार कार्ड पाठवले आणि त्या वरून आम्ही पत संस्थेत खाते उघडले. यापूर्वी खातेदारांची सही न घेता खाते उघडले काय, त्यावर त्यांनी नकारार्थी उत्तर दिले. तेव्हा हेच खाते कां उघडले यावर भष्ट्राचारी उपजिल्हाधिकारी स्वाती सुर्यवंशी यांच्या सुचणे वरून खाते उघडल्याचे स्पष्टीकरण दिले. या संपूर्ण प्रकरणा मध्ये कोणीतरी मोठे राजकीय व्यक्ती असल्याचा आरोप होत आहे आणि डीडीआर वर देखील संशय व्यक्त केल्या जात आहे.
विना सहीच्या खात्यात 1 कोटी 7 लाख..
विना सहीच्या खात्यात 1 कोटी रुपये जमा करण्यात आल्याने हा पैसा भष्ट्राचार करून तो आदर्श महीला नागरिक सहकारी पत संस्थेत जमा तर नाही करण्यात आला अशी चर्चा संपूर्ण जिल्हात सुरू आहे. खाते उघडण्याच्या कुठल्याही फॉर्मवर सही न घेता एका व्हॉट्सॲप संदेश आणि कॉल वरून आदर्श महीला नागरिक सहकारी पत संस्थेने खाते उघडून त्यात 1 कोटीच्या वर रक्कम जमा करून घेतली असल्यामुळे बँकेचा संचालक मंडळावर मोठे प्रश्न निर्माण झाले आहे.
आदर्श महीला नागरिक सहकारी पत संस्थेवर कारवाई करा: विनासहीने खाते काढणाऱ्या आणि त्यात भष्ट्राचारी महिला अधिकाऱ्याचे कोट्यवधी रुपये जमा करणाऱ्या आदर्श महीला नागरिक सहकारी पत संस्थेची सखोल चौकशी करून कारवाई करण्यात आली पाहिजे. या पत संस्थेत मोबाईल फोन किंव्हा व्हॉट्सॲपच्या माध्यमातून असे किती लोकांनी विना सहीने खाते काढले याची सखोल चौकशी झाली पाहिजे असे नागरिकानी महाराष्ट्र संदेश न्युजशी बोलताना सांगितले.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348

