उमेश इंगळे अकोला जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- गोरगरीब लोकांसाठी शहरी भागातील दलित वस्तीतील नागरिकांसाठी प्रधानमंत्री आवास योजना सुरू करण्यात आली होती परंतु 2019 20 पासून सदर प्रधानमंत्री आवास योजना ही बंद झाली असून रमाबाई आंबेडकर नगर हरिहर पेठ अकोला येथील दलित वस्ती मधील नागरिकांचे घरकुल पास झाले असून अद्याप पर्यंत त्यांना कुठल्याही प्रकारचा निधी मिळाला नसून त्यांचे घरकुलाचे काम बंद पडले आहे.
प्रधानमंत्री आवास योजना केंद्र पुरस्कृत योजना असून शहर आणि ग्रामीण भागातील दारिद्रय रेषेखालील बेघर/कच्चेघर असलेल्या कुटूंबांना घरकुल बांधकामासाठी अर्थसहाय्य देणे हा योजनेचा उद्देश आहे. परंतु शेकडो कुटुंब या योजने पासून वंचित आहे. त्यामुळे या नागरिकांना राहण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे पावसाळा सुरू होण्यापूर्वी प्रधानमंत्री आवास योजना सुरू करण्यात यावी अशी मागणी सतीश तेलगोटे यांनी महानगरपालिका आयुक्त डॉक्टर सुनील लहाने यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.