मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- गडचिरोली जिल्यातील अहेरी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या खांदला ग्रामपंचायत येथील ग्रामसेविका ही गाव आणि सरपंच यामधील विकासात्मक मोठा दुवा समजला जातो. अहेरी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या खांदला ग्राम पंचायतीचे ग्रामसेविका मुख्यालयी राहत नसून ‘मनमर्जी नुसार येत असतात. त्यामुळे गाव विकासाला ‘मोठी खीळ’ बसेल हे साहाजिकच आहे. बरेचशे ग्रामसेवक अहेरी किंव्हा आलापल्ली वरुन जाणे येणे करीत 30 ते 40 किलोमीटरचा प्रवास करीत असतात. त्यामुळे तुम्हीच सांगा गावाचा विकास तरी कसा साधणार? असा सवाल सामान्य जनते पुढे आला आहे.
अहेरी पंचायत अंतर्गत खांदला ग्रामपंचायतीचे ग्रामसेविका कार्यालयात हजरच राहात नाहीत जिल्हा परिषदेमार्फत राज्यशासनाच्या व केंद्रशासनाच्या कल्याणकारी योजना राबविल्या जात असतात परंतु कल्याणकारी योजना शासन दरभारी म्हणून या सेवा ग्रामीण भागातील जनतेला सर्वकाळ उपलब्ध होतील, असे शासनाकडून पाहिले जाते. यासाठी जिल्हा परिषदेमार्फत नियुक्त केल्या जाणाऱ्या ग्रामसेवकांना मुख्यालयी राहणे बंधनकारक केले आहे. मात्र, गावपातळीवर ग्रामसेवकांना गावाचा सर्वांगीण विकासाच्या अनुषंगाने मुख्यालयी राहणे बंधनकारक असल्याचा ग्रामविकास विभागाने धोरणात्मक निर्णय देखील घेतला आहे. मात्र, सदर निर्णयाची पायमल्ली होताना 100%दिसून येत आहे.
याकडे वरिष्ठांचा असलेला दुर्लक्षपणा कारणीभूत असल्याचे एकंदरीत चित्र दिसून येत आहे. ग्रामपंचायती मध्ये नेहमी कुलुपबंदच असते तर इतर कर्मचारीपण जातात कुठे हाही संशोधनाचा विषय झाला आहे.व वरीष्ठ स्तरावरून चौकशी होणे गरजेचे झाले आहे.शासन व प्रशासनानी लक्ष देऊन कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहून सेवा देण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

