अनिल अडकिने नागपूर सावनेर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर १ जुन:- सावनेर विश्राम गृह येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची २९९ वी जयंती ३१ मे २०२४ शुक्रवारी दुपारी ३.३० वा. उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य धनगर समाज महासंघाचे नागपूर जिल्हा अध्यक्ष प्रा बाबा टेकाडे होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ऍड. सूरज भोंगडे, प्राचार्य महादेव खरबडे, सेवानिवृत्त नगर भूमापन अधिकारी गुलाब टेकाडे आदी होते.
सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेची पूजाअर्चा करून पुष्पमाला अर्पण करण्यात आली. याप्रसंगी अध्यक्षीय भाषणात राजमाता पुण्यासह अहिल्याबाई होळकर यांनी विपरीत परिस्थितीतही जिद्दीने आणि धरल्याने राज्य कारभार सांभाळला आजचा ७/१२ म्हणजे त्यांच्या राज्यातील त्यांनी आपल्या जनतेला उपलब्ध करून दिलेले उपजीविकेचे साधन होय. प्रत्येक कुटुंबाला विविध फळांचे १२ झाडे दिली. यातील ५ झाडाच्या फळांचे उत्पन्न राज्याचा महसूल म्हणुन द्यायचे आणि ७ झाडाच्या उत्पन्नात कुटुंबाचा खर्च भागवायचा असा त्यांचा दूरदृष्टीकोण होता. म्हणजे राजमाता अहिल्याबाई होळकर आपल्या प्रजेची किती दक्षता घेत होत्या हे निदर्शनास येते असे सांगितले.
यावेळी अन्य मान्यवरानी सुध्दा मार्गदशन केलें. या
कार्यक्रमाचे संचालन हिरालाल आगरकर यांनी केले. रमेश बांबल यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला सावनेर, उमरी, हत्तीसरा, नांदागोमुख, केळवद, टेम्भुरडोह, कोटोडी तथा अन्य गावातील धनगर बंधू भगिनी अधिक संख्येने उपस्थित होत्या, आजच्या राजकीय पुढाऱ्यांनी राजमाता अहिल्याबाई होळकर यांचा आदर्श समोर ठेऊन त्यांच्या जीवनपटातून किंबहुना राजकारभरातून प्रेरणा घ्यावी जणे करून राज्यात विकासाची गंगा वाहितल तद्ववत गोरगरीब सर्वसामान्य जनतेलाही दिलासा मिळेल हे मात्र निश्चित असा अध्यक्षीय भाषणात आवर्जून उल्लेख केला.
यावेळी हिरालाल आगरकर, यशवंत पाटील, विठ्ठल खाटीक, श्रीधर टेकाडे, नारायण बोबडे, रामेश्वर चाके, महादेव आगरकर, रामभाऊ तवले, रमेश बांबल, हरी तवले, नामदेव चाके, विष्णु तवले, अजाब आगरकर, शोभा चाके, मिनक्षी आगरकर, वर्षा आगरकर, शशिकला तवले आदी प्रामुख्याने उपस्थिती होत्या.