नदी काटी न जाण्याचे आवाहन, मदतीसाठी अहेरी विधानसभा क्षेत्राचे अजयभाऊ कंकडावार यांची हेल्प लाईन सेवा सुरु.
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- जिल्हात पावसाने हाहाकार माजविला आहे. मागील दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. जोरदार पावसामुळे सर्वत्र पाणी साचले आहे. दरम्यान जिल्ह्यात दोन दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे परिसरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. नदी- नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आला आहे. गंभीर पूरपरिस्थिती अनेक भागात नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले.
मुसळधार पाऊस सुरु वैनगंगा नदीला पूर आला आहे. त्यात गोसीखुर्द प्रकल्पा मोठ्या प्रमाणात पाण्याची वाढ झाली आहे. प्रशासनाने नदी जवळील नागरिकांना सुरक्षित राहण्याचे आवाहन केले आहे. त्यात नदी काटी न जाण्याचे आवाहन गडचिरोली माजी जिल्हा परिषद अध्यक्ष व अहेरी विधानसभा क्षेत्राचे अजय कंकडावार यांनी नागरिकाच्या मदतीसाठी हेल्प लाईन सेवा सुरु केली आहे.
गोसीखुर्द प्रकल्प पाण्याची वाढ. गोसीखुर्द प्रकल्प स्थळावरून प्राप्त माहितीनुसार धरणाचे पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्यामुळे तसेच धापेवाडा बॅरेजचा विसर्ग वाढल्यामुळे गोसीखुर्द धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्याकरिता पुढील काही तासात धरणाच्या विसर्गामध्ये आवश्यकता भासल्यास 10,000 ते 12,000 क्युमेक्स पर्यंत टप्प्या-टप्प्याने वाढ करण्यात येईल. तरी वैनगंगा नदी पात्रात आवागमन करणाऱ्यांनी आवश्यक काळजी घ्यावी व नदीकाठी असलेल्या गावातील नागरिकांनी उचित सतर्कता बाळगावी, नदीकाठी जाणे टाळावे. असे आवाहन अहेरी विधानसभा क्षेत्राचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडावार यांनी पत्रकातून केली आहे.