आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- सिंदी रेल्वे ते सेलडोह हा रस्ता २०१८ पासून खराब असल्याने वाहतूक करताना तारेवरची कसरत करावी लागत होती.यावरून डॉ. उमेश वावरे वैज्ञानिक यांनी दि.२२/८/२०२४ अंतिम संस्कार आंदोलन शासनाचे विरोधात करताच शासन प्रशासन व संबंधित बांधकाम विभाग झोपेतुन जागे झालेगत दुसऱ्याच दिवशी सकाळी दि.२३ ऑगस्ट ला रस्त्याचे कामाला सुरुवात केली.
सदर सिंदी रेल्वे ते सेलडोह हा सेवाग्राम बुटीबोरी वर्धा जाण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असुन २०१८ पासून हा बांधकामा पासून वंचित असल्याने सामाजिक कार्यकर्ते डॉ. उमेश वावरे वैज्ञानिक यांच्या नेतृत्वात परीसरातील लोकांनी रस्त्यावर अंतिम संस्कार आंदोलन सुरू केले होते. दुसऱ्याच दिवशी झोपेतुन जाग आल्यागत रस्त्याचे कामाला सुरुवात केली. या रस्त्याने प्रवास करताणा वाहन चालकांना अनेकदा अपघाताचा सामना करावा लागला. आंदोलन करताच रस्ता दुरुस्तीला सुरूवात झाल्याने डॉ. उमेश वावरे वैज्ञानिक यांच्या नेतृत्वाला यश आल्याचे सर्वत्र बोले जात आहे.