प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि.23:- अलीकडील काळात शालेय विद्यार्थ्यांचा तसेच निवासी विद्यार्थ्यांच्या दृष्टीने गंभीर स्वरुपाच्या काही अनुचीत घटना राज्यात इतरत्र घडलेल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थीनीच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. अशा प्रकारच्या अनुचीत घटना घडु नये याची दक्षता घेऊन मुलींच्या सुरक्षेची काळजी घ्यावी, अशा सुचना जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी वसतीगृहाच्या गृहपाल श्रीमती पाटील यांना दिल्या.
महादेवपुरा येथील समाज कल्याण विभागाच्या मागासवर्गीय मुलींचे वसतीगृहाला जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी अचानक भेट देऊन मुलींच्या वसतीगृहाच्या इमारत व आजुबाजुच्या परिसराची पाहणी करुन मुलींच्या सुरक्षेबाबत आढावा घेतला यावेळी त्यांच्या सोबत समाज कल्याण सहाय्यक आयुक्त प्रसाद कुळकर्णी उपस्थित होते.
यावेळी राहुल कर्डिले यांनी यांनी वसतीगृहातील विद्यार्थ्यांशी संवाद साधुन त्यांना उद्भभवणऱ्या अडीअडचणी तसेच सोईसुविधा बाबत माहिती घेऊन उपस्थित अधिकारी, कर्मचारी मुलींना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेततेविषयी वसतीगृहातील गृहपाल व कर्मचारी यांचेशी चर्चा करुन मुलींच्या सुरक्षेतेविषयी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. तसेच वसतीगृह इमारत व परीसरात अद्यावत अत्याधुनीक सिसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे व वसतीगृहात कोणत्याही अनुचीत घटना घडणार नाही यांची दक्षता घेण्यात याव्यात असे ते म्हणाले.
वर्धा जिल्ह्यात समाज कल्याण विभागामार्फत 10 मुलामुलींचे शासकीय वसतीगृह व 2 निवासी शाळा कार्यरत आहे. या वसतीगृह व निवसी शाळेत अनु.जाती, नवबौद्ध घटक, अनु जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागास तसेच अनाथ, अपंग अशाप्रकारच्या वंचीत घटकातील हजारो विद्यार्थी शिक्षण घेत असल्याचे यावेळी प्रसाद कुळकर्णी यांनी जिल्हाधिका-यांना सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी यांनी वसतीगृहाचे प्रशासन सुव्यवस्थीत असल्याने प्रसाद कुळकर्णी सहाय्यक व वसतीगृहाच्या गृहपाल श्रीमती पाटील यांचे अभिनंदन केले.