मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- उपपोलीस स्टेशन जिमलगट्टा अंतर्गत येणारे मौजा येंकाबंडा येथील नामे गणेश सन्याशी टेकाम या आरोपीने गावातील संतोष विठ्ठल आलाम याला शुल्लक कारणावरुन भांडण करुन त्याच्यावर कुऱ्हाडीने हल्ला केला होता. या प्रकरणी उपपोलीस स्टेशन जिमलगट्टा येथे विविध कलमे अन्यवे गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी आरोपी विरुध्द प्रथम वर्ग न्यायालय अहेरी येथे सुनावनी सुरु होती. दिनांक 31 ऑगस्ट रोजी न्यायालयाने सुनावनी पुर्ण करुन आरोपी दोषी आढळल्याने गणेश सन्याशी टेकाम याला 3 महिण्याच्या साधा कारावास आणि 2000 रुपये दंडाची शिक्षा ठोकावली आहे.
घटनेची हकीकत पुढीलप्रमाणे आहे की, पिडीत संतोष विठ्ठल आलाम वय 35 वर्ष रा.येंकाचंडा ता.अहेरी हे दिनांक 28 एप्रिल 2019 रोजी सायंकाळी आपले घरी असताना आरोपी गणेश सन्याशी टेकाम वय 40 वर्ष याने संतोष त्याचा घरी बोलावुन त्याच्या सोबत शेत मजुरीच्या कारणावरुन वाद घालायचा सुरुवात केली. पिडीत संतोष आलाम यास प्रति दिवस 300 रुपये रोजी परवडत नसल्याने मी कामावर येणार नाही असे बोलुन घरी परत जात असताना आरोपी गणेश टेकाम याने संतोष यांच्या मागून येऊन कुऱ्हाडीने हल्ला करून त्यास जखमी केले. वरुन उप पोलीस स्टेशन जिमलगट्टा येथे अप क्र 03/2019 कलम 326 भादवी अन्वये आरोपी विरुध्द गुन्हा नोंदवून तपास पुर्ण करुन दोषारोपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले होते.
या प्रकरणी दिनांक 31 ऑगस्ट रोजी न्यायदंडाधिकारी शाहिद साजीदुज्जामाँ एम.एच प्रथम वर्ग अहेरी यांनी सुनावनी पुर्ण करुन आरोपी दोषी आढळल्याने त्यास 3 महिने साधा कारावास व 2000 हजार रुपये दंड ठोठावलेला आहे. सदर गुन्हयाचा तपास पोउपनि संजय निंबाळकर उप पोलीस स्टेशन जिमलगड्डा यांनी केलेला असुन सरकार तर्फे न्यायालयीन कामकाज सरकारी अभियोक्ता सुधाकर पारधी यांनी बघितले असुन त्यांना कोर्ट पैरवी अंमलदार पोहवा संतोष गुम्मला उपविभाग जिमलगट्टा यानी सहकार्य केलेले आहे.