राजेंद्र झाडे, चंद्रपूर उपजिल्हा प्रतीनीधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गोंडपिपरी:- 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंब पर्यंत महिला व बालकल्याण विभाग गोंडपिपरी याच्यासोबत पोषण अभियान जनजागृती मोठ्या प्रमाणात सूरू आहे. सही पोषण-देश रोशन या संकल्पनेतून आजचे बालक देशाचे भविष्य म्हणून जन्माला येणारा प्रत्येक बालक सूदृढ व सशक्त असले पाहिजे म्हणून राज्य व केंद्र सरकारमार्फत अनेक योजना सूरू करण्यात आली. त्यापैकी 0-6 वर्षापर्यंत बालकांना उत्तम व पौष्टिक आहार मिळाले पाहिजे म्हणून शासन पोषण आहार बालकांपर्यंत पोहचविण्याचा काम अंगणवाडी सेविकांमार्फत करत आहे. त्याची माहिती प्रत्येक स्तनदा माता व गरोदर स्त्रीला असणे हि काळाची गरज आहे, त्यासाठी धाबा येथील कोंडय्या महाराज सभागृह येथे अंगणवाडी सेविका व गरोदर स्त्रीया, स्तनदा माता यांच्या उपस्थितीत पोषण अभियान राबविण्यात आला व रॅली काढून गावात जनजागृतीकरण्यात आली, तसेच किशोर वयीन मूलींना सूद्धा यात सहभागी करून त्यानी घ्यावयाचे आहार व कोणती काळजी घ्यावी याबद्दल मान्यवरांकडून मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी मंचावर अध्यक्ष म्हणून मा. जि.प.सदस्य वैष्णवी अमर बोडलावार, महिला बालकल्याण प्रकल्प अधिकारी गीता केकान, धाबा सरपंच नंदा घोगरे, मा. सरपंच रोशनी अनमूलवार, कंचन गरपल्लीवार, सेवानिवृत्त अंगणवाडी सेविका पूप्पलवार, पर्यवेक्षिका मेश्राम, ङोईजळ मॅडम, देवगडे, प्राथमिक आरोग्य केंद्र धाबाचे आरोग्य अधिकारी, कर्मचारी तसेच मोठ्या संख्येत महिलांची उपस्थिती होती.