विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली दि.16:- येथून एक खळबळजनक माहिती समोर आली. दिनांक 14 ऑक्टोंबर रोजी रात्री 9.00 वाजताच्या सुमारास कसनसुर कडुन एटापल्लीकडे MH 34 BZ 5197 या क्रमांकाचा ट्रक भरधाव वेगाने येत होता. त्याच वेळी दसऱ्या निमित्त दुर्गादेवीच्या विसर्जन मिरवणुकीची गर्दी जमली होती. त्यात वेळी हा भरधाव वेगाने ट्रक या गर्दीत घुसला यावेळी नागरिक इकडे तिकडे रस्त्याचा बाजूला झाल्याने भीषण दुर्घटना टळली. संयोगाने त्याच वेळी ट्रक मधील डीझल संपल व हा ट्रक रस्त्यावर थांबला. यावेळी उपस्थित नागरिकांनी वाहन चालक रणबीर याला चोप दिला व गाडीत जे पोते भरलेले होते त्याचे खाली दारूच्या पेट्या भरलेले आहे असा संशय लोकांना आला त्यानंतर तात्काळ याबाबत पोलिसांना माहिती दिली.
माहिती मिळताच घटनास्थळी एटापल्ली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आपल्या ताप्यासह दाखल झाले. यावेळी पोलिसांनी ट्रक्ट ताब्यात घेत तपासनी केली असता सुरू असता ट्रक मध्ये धान भरून होते. वाहन चालकांकडे टी. पी. परवाना उपलब्ध होता. पण त्या टी. पी मध्ये गडचिरोली राईस मिलला धान पोहचवायचे असा उल्लेख आढळून आला पण हा ट्रक मात्र एटापल्ली कडे जात असल्याने हे धान दुसरीकडे जाणार होते हे नक्की. त्यामुळे धानाचा काळाबाजार करण्यात येत होता यावरून ये सिद्ध झाले आहे.
धानाचा काळाबाजार बदल ट्रक डायव्हरला विचारणा केली असता ह्यापुर्वी चार पाच वेळा ह्याच प्रकारे धान नेल्याचे कबूल केले आहे. तेंव्हा हा धान नक्की कुठे जात आहे. याचा तपास घेणे पोलीस विभागा समोर आव्हान उभे केले आहे. व ह्या व्यवसायात बडी हस्ती असल्याचे लोक कुजबुज करीत असून तर्कवितर्क काढले जात आहे. यावी तहसीलदार गांगुर्डे हे स्वतः घटनास्थळी दाखल झाले आणि धानाच्या काळाबाजारी बाबत सखोल चौकशी करण्यासाठी पोलीसांना सांगितले.