देचलीपेटा मुख्य रस्त्यापासून कम्मासुर 3 किमी अंतरावर असलेल्या विविध समस्याच्या विळख्यात.
मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.
अहेरी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या कम्मासुर गावाची अवस्था अत्यंत गंभीर झाली असून नागरिकांना अक्षरशः मरणयातना सहन कराव्या लागत आहेत. अहेरीपासून सुमारे 70 किलोमीटर अंतरावर असलेल्या या गावात मूलभूत सुविधांचा पूर्णपणे अभाव असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
गावात सिमेंट रस्ते नाहीत, नाल्यांची व्यवस्था नाही आणि वीजपुरवठा असूनही तो नसल्यासारखाच असल्याने नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. विशेष म्हणजे, देचली मुख्य रस्त्या पासून सुमारे 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या कम्मासुर गावाच्या मध्यभागी एक मोठा नाला असून, त्यावर गेल्या 30 वर्षांपासून पुलाची मागणी करण्यात येत आहे. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही शासन व प्रशासनाकडून झालेली नाही.
या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभाग, गडचिरोलीच्या अधीक्षक अभियंता सौ. ठाकरे यांना विचारणा केले असता त्यांनी “व्ही.आर. नंबर तपासून पुढील कार्यवाही करू” असे आस्वासन देण्यात आले दरम्यान, माजी पालकमंत्र्यांना अहेरी येथे एका कार्यक्रमादरम्यान गावकऱ्यांनी आपली व्यथा मांडली असता, त्यांनीही पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले आहे.
दरम्यान, भाजपचे सदस्य तसेच जेष्ठ पत्रकार जावेद अली, महेश अलोणे, आणि युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष मधुकर गोंगले आणि सुवर्ण महाराष्ट्र न्यूजचे जिल्हा पत्रकार इन्नू पठाण यांनी प्रत्यक्ष गावात जाऊन पाहणी केली असता परिस्थिती अत्यंत चिंताजनक असल्याचे स्पष्ट झाले.
गावकऱ्यांच्या मते, अनेक वर्षांपासून लोकप्रतिनिधींना वारंवार निवेदने देऊनही कोणतीही ठोस पावले उचलली गेली नाहीत. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी इशारा दिला आहे की, जर येत्या 15 दिवसांत कम्मासुर गावाच्या विकासासाठी काम सुरू झाले नाही, तर जिम्मलगट्टा क्रॉसिंग येथे चक्का जाम आंदोलन करण्यात येईल.असा इशारा गावकरी पत्रकातून केली आहे.
निष्कर्ष:
कम्मासुर गावातील नागरिक मूलभूत सुविधांपासून वंचित असून प्रशासन व लोकप्रतिनिधी यांचे दुर्लक्ष उघड होत आहे. आता तरी संबंधित विभाग आणि लोकप्रतिनिधी याकडे गांभीर्याने लक्ष देतात का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.या वेळी गावातील संपूर्ण नागरिक, महिला, पुरुष, मोठया संख्येने उपस्थित होते.

