रसायन युक्त पाण्यामुळे ब्राह्मणी येथील खडक नदी दूषित, शेती, प्राणी व नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम.

युवराज मेश्राम, विदर्भ ब्युरो चीफ 9923296442

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपुर:- जिल्हातील कळमेश्वर तालुक्यातील ब्राह्मणी परिसरातील खडक नदीत औद्योगिक परिसरातील कारखान्यातील रसायन युक्त पाणी सोडण्यात येत असल्याने जलप्रदूषण वाढले आहे. त्यामुळे मासोळ्या तसेच इतर जलचर प्राणी मृत्युमुखी पडत आहेत. सोबतच शेती व जनावरांचे आरोग्यावरही विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

रसायन युक्त दूषित पाणी खडक नदीमध्ये सोडले जात असल्याने नदी शेजारील शेतजमीनी अडचणीत सापडल्या आहेत. रसायनामुळे नाल्यातील पाण्याचा रंग काळाभोर झालेला आहे. या परिसरातील जनावरांचे आरोग्य धोक्यात आले असून नाल्याचे पाणी जमिनीत झिरपूर विहिरींचे स्तोत्र दूषित झाल्यास शेतीचे ओलित धोक्यात येण्याची चिन्हे आहेत. तसेच नाल्याचे पाणी पिल्यानंतर जनावरांना चर्मरोग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकंदर कंपनी मुळे नदीचे दूषित पाणी मानवाला व शेतीला नुकसानदायक ठरणार आहे.

अगोदरच कळमेश्वर शहरातील भूगर्भातील पाणी रसायन युक्त असल्याने शहरवासीयांना बाहेरील पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. शहरातील पाणी घर बांधकाम करण्याच्या सुद्धा कामी येत नसून ज्या नागरिकांनी भूगर्भातील पाणी वापरून घरे बांधले त्यांना अल्पावधीतच तडे गेले आहेत. यामुळे आता खडक नदीत सोडण्यात येणाऱ्या दूषित पाण्यामुळे ब्राह्मणी, वरोडा, झुनकी, सावळी (बु), बोरगाव (खुर्द), ब्रह्मपुरी या गावातील भूगर्भातील जलसाठा दूषित झाल्यावर भविष्यात तहान कशी भागवावी असा प्रश्न येथील नागरिकांसमोर उपस्थित राहणार आहे.

यामुळे औद्योगिक परिसरातील कारखान्यांनी दूषित पाण्याची समस्या सोडविण्यासाठी वेळीच उपाययोजना करावी. याकरिता जलशुद्धीकरण यंत्रणा कार्यान्वित करावी अशी मागणी वरोडा येथील शेतकरी बंडु ढवळे, नरेश राऊत, राजू काकडे, प्रशांत डाखोळे, ईश्वर पारसे, दामोदर राऊत आदींनी केली आहे.

फोटो

प्रशांत जगताप

Share
Published by
प्रशांत जगताप

Recent Posts

आता लाडका पत्रकाराचा नंबर लागेल का ! महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री लक्ष देतील का ?

देवेंद्र सिरसाट हिंगणा तालुका नागपूर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री…

3 mins ago

नाशिक: पती पत्नीने गळफास लावून आत्महत्या, 10 वर्षीय चिमुकली मुलगी सुद्धा पलंगावर मृतावस्थेत.

मानवेल शेळके नाशिक जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नाशिक:- येथून एक खळबळजनक घटना…

17 mins ago

महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री स्व. शरद काळे यांचा स्मृति दिन साजरा.

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक: 17 सप्टेंबर 2024 रोज…

1 hour ago

कवठा येथील सरपंच प्रवीण जायदे यांच्यासह अनेकांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश.

खासदार अमर काळे, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या उपस्थितीत केला राष्ट्रवादित पक्ष प्रवेश. मुकेश चौधरी…

1 hour ago

सिंदी तहसील कार्यालय वर विविध मागण्यासाठी कामगार नेते डाॅ. उमेश वावरे यांच्या नेतृत्वात भव्य मोर्चा.

आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…

2 hours ago