श्याम भुतडा बीड प्रतिनिधी
बीड:- जिल्हातून एक भीषण अपघात झाल्याची दुःखद बातमी समोर येत आहे. त्यामुळे बीड जिल्हात शोककळा पसरली आहे. पाटोदा येथील पाटोदा- मांजरसुबा महामार्गावर बामदळे वस्तीवर 14 ऑगस्ट रोजी पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास कार व टेम्पोचा भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की, यात कारमधील सहा जण जागीच ठार झाले. लग्न समारंभासाठी हा परिवार पुण्याला जात होता. मृतांत एकाच कुटुंबातील पाच जणांचा समावेश आहे.
जीवाचीवाडी (ता. केज) येथील रामहरी चिंतामण कुटे यांचे कुटुंबीय लग्न समारंभासाठी पुण्याला जात होते. बामदळे वस्तीवर टेम्पो व कारची समोरासमोर धडक झाली. यात सहा जण ठार झाले आहे. टेम्पोच्या खाली कार घुसली होती ती काढण्यासाठी क्रेनची मदत घ्यावी लागली. मृतांत दोन लहान मुलाचा समावेश आहे.
घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पाटोदा ठाण्याचे सहायक निरीक्षक डॉ. रामचंद्र पवार व सहकाऱ्यांनी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून रुग्णालयात पाठविले. या घटनेने लग्न समारंभ व जीवाचीवाडी गावावर शोककळा पसरली आहे. मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.
राज शिर्के मुंबई महानगर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मिरा भाईंदर:- जगाला बुद्ध धम्माशिवाय…
आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- स्थानीय चौधरी वॉर्ड हिंगणघाटचे…
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांचा हिंगणघाट येथे दौरा. अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुलगाव:- स्थानीक गुन्हे शाखा वर्धा…
उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- सेवक संघटित व संघटित आरोग्य…
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवर पोलिसांची तैनाती. हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी महाराष्ट्र…