एका क्षणात चंद्रपुर जिल्हात एक घर 70 फुट जमिनीत उभं गाडलं गेलं, त्याच क्षणात परिवारच सर्व संपल.

सौ. हनिशा दुधे, बल्लारपूर तालुका प्रतिनिधी


चंद्रपूर:- चंद्रपुर जिल्हातील घुग्गुस शहरातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. त्यामुळे सर्व शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घुग्गुसमध्ये एक घर चक्क 70 फूट जमिनीत उभं गाडलं गेलं. कोळसा खाणींच्या जवळ असलेल्या आमराई भागात ही घटना घडली आहे. काल अचानक घर हालायला लागल. त्यामुळे घरातील लोक तातडीने घरा बाहेर धावत निघून आले आणि त्यानंतर अवघ्या काही क्षणात हे घर जमिनीत गाडल गेलं. 70 फुटांचा खड्डाही पडला. कोळसा खाणीमुळे हा प्रकार झाल्याची या भागात चर्चा आहे.

चंद्रपूर जिल्हात मोठ्या प्रमाणत कोळसा खाणी आहे. त्यामुळे हा जिल्हा धोकादायक आहे अस तरी याघटनेवरून समोर आले आहे. घुग्गुस शहरात गजानन मडावी यांचं हे घर होतं. कोळसा खाणींच्या जवळ असलेल्या आमराई वार्डात ही घटना घडली. या शहराशेजारी सर्वत्र असलेल्या भूमिगत कोळसा खाणीमुळे हा प्रकार झाल्याची चर्चा आहे. गजानन मडावी यांचे राहते घर संध्याकाळच्या दरम्यान एकाएक हलू लागल्याने भीतीमुळे घरातील सदस्य घरा बाहेर निघाले. त्यानंतर काही क्षणातच अख्खे घर 70 फूट जमिनीत गाडल्या गेले. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भितीखाली आहे.

सरकारी कोळसा कंपनी वेस्टर्न कोल फील्ड्स लिमिटेडच्या खाणीमुळे या परिसरात अनेकदा घरांना तडे गेल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र अशा पद्धतीने एकच घर 70 फूट गडप होण्याची ही खळबळजनक घटना पहिल्यांदा समोर आली आहे. घटनास्थळी महसूल- खाण प्रशासन आणि पोलिसांचे पथक दाखल झाले आहे.

परिसरातील नागरिकांनी याआधीही कोळसा कंपनी वेस्टर्न कोल फील्ड्स लिमिटेडच्या खाणीमुळे तिथल्या घरांचं नुकसान होत असल्याबाबत तक्रारी केल्या आहेत. वारंवार सांगून देखील याबाबत कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही. आता घुग्गुसमधील या घटनेनंतर तरी प्रशासनाला जाग येईल का? असा सवाल केला जात आहे. अख्खं घरच गाडलं गेल्यानं परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. सुदैवाने यावेळी घरातील लोक घराबाहेर पडल्यानं कुठली जीवितहानी झाली नाही.

प्रशांत जगताप

Share
Published by
प्रशांत जगताप

Recent Posts

महाराष्ट्रातील महायुती सरकारची कोंडी, सरकारने आचार संहितेच्या उल्लंघन केल्या बाबत चौकशी सुरू.

राज शिर्के मुंबई महानगर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल…

1 hour ago

भारतीय बौद्ध महासभा राजुरा तालुका व ग्राम शाखा भेदोडा चा वर्षावास धम्म प्रवचन मालिकेचा समारोपिय कार्यक्रम संपन्न

*कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीय बौध्द महासभेचे अध्यक्ष आयु, किशोर तेलतुंबडे यांचे प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार* सौ.…

4 hours ago

भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने महात्मा फुले वार्ड यशोधरा बुद्ध विहार हिंगणघाट येथे वर्षावास समाप्ती निमित्ताने कार्यक्रम संपन्न.

प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- भारतीय बौद्ध महासभा तालुका…

1 day ago

सांगलीत पोलीस विवाहित महिलेने पाहिले लग्न लपवून केलं दुसरे लग्न, पोलिसांनी केला गुन्हा दाखल.

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- येथून एक खळबळजनक घटना समोर…

1 day ago

वर्धा जिल्हा ग्रंथालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा.

प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि.16:- माजी राष्ट्रपती डॉ.…

2 days ago

भारतीय कम्युनिष्ठ पार्टी अहेरी विधानसभा कडून एटापल्ली येथे भव्य धरणे आंदोलन.

विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- दि.14 ऑक्टोबर 2024 सोमवार…

2 days ago