विश्वास त्रिभुवन, अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी
राहुरी:- अहमदनगर जिल्हातून एक खळबळ जनक घटना समोर आली आहे. गिरणी वरून दळण दळून आणते, असे सांगत घरातून बाहेर पडलेल्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची घटना राहुरी तालुक्यातील तांदूळवाडी येथे (दि.23) ऑगस्ट रोजी घडली. 17 वर्षीय अल्पवयीन मुलगी आई-वडिलांसोबत राहुरी तालुक्यातील तांदुळवाडी परिसरात राहते. या मुलीचे आई, वडील मोल मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. (दि.23) रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास अल्पवयीन मुलगी तांदुळवाडीत गिरणीवर दळण दळून आणते, असे सांगून घरातून गेली.
ती बराच वेळ झाला, तरी परत घरी आली नाही. त्यावेळी तिच्या नातेवाईकांनी गावासह परिसरात तिचा शोध घेतला. मात्र, ती मिळाली नाही. त्यानंतर आजूबाजूच्या गावांसह नातेवाईंकांकडे तिचा शोध घेतला, परंतु ती कोठेही मिळाली नाही. अखेर आई-वडिलाची खात्री झाली की, मुलीला कोणीतरी पळवून नेले आहे. त्यांनी राहुरी पोलिसांत धाव घेऊन घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. मुलीच्या आईने पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपी विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पो. नि. प्रताप दराडे करीत आहेत.
सौ. हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि मो 9764268694 चंद्रपूर, दि. 18 : महाराष्ट्र विधानसभा…
राज शिर्के मुंबई महानगर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल…
*कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीय बौध्द महासभेचे अध्यक्ष आयु, किशोर तेलतुंबडे यांचे प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार* सौ.…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- भारतीय बौद्ध महासभा तालुका…
उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- येथून एक खळबळजनक घटना समोर…
प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि.16:- माजी राष्ट्रपती डॉ.…