भारतीय संघ जेव्हा – जेव्हा क्रिकेट वर्ल्डमध्ये फायनलमध्ये जाते, तेव्हा- तेव्हा देशाच्या विद्यमान पंतप्रधानांची खुर्ची जाते.

महाराष्ट्र संदेश न्युज प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील विश्वचषकाचा अंतिम सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यासाठी दोन्ही संघ आपल्या पूर्ण तयारीने उतरले आहे. त्यात ऑस्ट्रेलिया संघाने स्टॉस जिंकून भारताला पहिले फलंदाजी साठी निमंत्रण दिले आहे. त्यात भारताने 240 धावा काढल्या आहे. पण या अंतीम सामना सुरू असताना एक महत्वपूर्ण चर्चा सुद्धा समाज माध्यमांवर आकडेवारीनुसार सुरु झाली आहे.

भारतीय क्रिकेट संघ जेव्हा-जेव्हा क्रिकेट वर्ल्डमध्ये फायनलमध्ये पोहोचते, तेव्हा-तेव्हा देशातील विद्यमान पंतप्रधानांची पुढील लोकसभा निवडणुकीत खुर्ची जाते हा इतिहास आहे. डॉ. मनमोहन सिंग यांचा पंतप्रधान पदाचा कार्यकाळ हा 10 वर्षाचा होता. त्या दरम्यान, म्हणजे 2003 नंतर भारतीय क्रिकेट टीम फायनलमध्ये पोहिचली नाही. तर 2019 मध्ये तेच झालं आणि मोदी पुन्हा पंतप्रधान झाले होते. आता 2023 क्रिकेट वर्ल्डमध्ये फायनलमध्ये भारतीय संघ फायनलमध्ये पोहिचला आहे आणि 2024 मध्ये लोकसभा निवडणुका आहेत.

आता बघुया आकडेवारी..
1983 विश्वकप –
भारतीय संघ फायनलमध्ये पोहोचला आणि वर्ल्ड कप सुद्धा जिंकला – इंदिरा गांधी यांची पुढच्या निवडणुकीत पंतप्रधान पदाची खुर्ची गेली

2003 विश्वकप – भारतीय संघ फायनलमध्ये पोहोचला आणि वर्ल्ड कप फायनलमध्ये पराभव झाला – अटल बिहारी वाजपेयी यांची पुढच्या निवडणुकीत पंतप्रधान पदाची खुर्ची गेली

2011 विश्वकप – भारतीय संघ फायनलमध्ये पोहोचला आणि वर्ल्ड कप सुद्धा जिंकला – डॉ. मनमोहन सिंग यांची पुढच्या निवडणुकीत पंतप्रधान पदाची खुर्ची गेली

2023 विश्वकप – परत एकदा भारतीय संघ फायनलमध्ये पोहोचला आहे. वर्ल्ड कप जिंकावा ही सर्व देशवासीयांची आशा, पण भाजपचा 2024 मध्ये पराभव होऊन विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पंतप्रधान पदाची खुर्ची जाणार याची चर्चा सुद्धा समाज माध्यमांवर सुरु झाली आहे.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348

मनवेल शेळके

View Comments

Share
Published by
मनवेल शेळके

Recent Posts

चंद्रपुर जिल्हातील या विधानसभा मतदार संघात 6 हजार 853 बनावट मतदारांची नावे समाविष्ठ करण्याचा डाव फसला.

संतोष मेश्राम राजुरा तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल…

4 hours ago

बौद्ध धम्म संस्कार संघ सांगलीच्या वतीने अशोका विजयादशमी चे दहा दिवस महामातांच्या शौर्याचा कर्तृत्वाचा गौरवाचा विचाराचा जागर.

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- बौद्ध धम्म संस्कार संघ सांगली…

4 hours ago

चंद्रपाल चौकसे लोकसेवा प्रतिष्ठाण आयोजित रोजगार महोत्सवात १८२४ जणांचे ऑन स्पॉट नियुक्ती पत्र.

एक पाऊल तरुणाईचे,भविष्य घडविण्याकडे- चंद्रपाल चौकसे पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपुर महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन…

5 hours ago

दिप संदेश मंडळ देवळे मुंबई संघटनेतर्फे अशोका विजयादशमी व ६८ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन महोत्सव कौटुंबिक सोहळ्यासह उत्साहात संपन्न.

गुणवंत कांबळे. मुंबई शहर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- सायन कोळीवाड्यातील सुप्रसिध्द तक्षशिला…

5 hours ago

माँ तुळजा भवानी देवस्थान मनिष नगर नागपुर येथे ६५१ मनोकामना घट प्रज्वलित.

पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपुर महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- दरवर्षीप्रमाणे यावर्षीही माँ तुळजा भवानी…

6 hours ago