आशीष अंबादे, वर्धा जिला प्रतिनिधि
मोबा. 8888630841
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- काल रविवारी सायंकाळी समुद्रपूर हिंगणघाट तालुक्यात मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. बोरांच्या आकाराच्या गारांनी शेतकऱ्यांच्या पिकांची प्रचंड हानी झाली. यामुळे शेतकरी हवालदिल आला आहे.
रविवारी सायंकाळच्या सुमारास समुद्रपूर तालुक्यातील व हिंगणघाट तालुक्यातील अनेक गावांत अवकाळी पाऊस गारांसह धोधो बरसला. शनिवारी संध्याकाळच्या सुमारास एक कोसळलेल्या पावसाने व गारपिटीने चांगलाच कहर केला. यासोबत जिल्ह्यातील इतरही गावांमध्ये मोठ्या प्रमाणात गारपीट झाली. गारपीट, पाऊस व वादळी वाऱ्यामुळे गहू पूरता झोपला तर चण्याच्या घाट्या फुटल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. या वादळी पाऊसमुळे शेतात पिकांवर गारांचे आच्छादन पसरले आहे. या पावसामुळे शेतात असलेला कापूस ओला झाला. तसेच फळबांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी, नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करावे, पंतप्रधान पीक विमा योजनेतून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली आहे.
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल नं. 9420751809 अहेरी : तालुक्यातील व्यंकटरावपेठा येथील प्रतिष्ठित नागरिक…
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल नं. 9420751809 गडचिरोली :: गडचिरोली जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाची अत्यंत…
देवेंद्र सिरसाट हिंगणा तालुका नागपूर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री…
मानवेल शेळके नाशिक जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नाशिक:- येथून एक खळबळजनक घटना…
* सरकारच्या अपयशाचा मांडणार लेखाजोखा* मधुकर गोंगले,गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.मो. नं.9420751809 गडचिरोली :: गडचिरोली जिल्हा काँग्रेस…
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक: 17 सप्टेंबर 2024 रोज…