कवी गणेश रामदास निकम
चाळीसगाव गणेशपूर
काय लिहावे मी
आपल्या मैत्री बद्दल
मैत्री एक गुंतवणूक
जी देते भावनांचे व्याज मुद्दल
जपल्या भावना एकमेकांच्या
तर ती होते अधिक घट्ट
मैत्री खरंच मित्राजवळ
करते लहान मुलासारखा हट्ट
रागावते मैत्री कधी तर
कधी ती मनातून चिडते
मित्रांसाठी मैत्री खरी
या जगाशीही लढते
मैत्री म्हणजे जगण्यासाठी
प्रेरक असे न संपणारे बळ
समजून घ्यावी आपण
बस एकमेकांची तळमळ
धावून जाते मैत्री आपली
मित्र अडचणीत आपला दिसता
मित्रांसोबत दिवस जातो
गप्पा मारत बसता बसता
सोडू नये हात मैत्रीचा
जरी अडचणी असतील लाख
चुकूनही स्वार्थापायी आपण
करू नये मैत्रिभावनेची राख
कवी गणेश रामदास निकम
चाळीसगाव गणेशपूर
मो.न.७०५७९०४६७७
९८३४३६१३६४
*कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीय बौध्द महासभेचे अध्यक्ष आयु, किशोर तेलतुंबडे यांचे प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार* सौ.…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- भारतीय बौद्ध महासभा तालुका…
उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- येथून एक खळबळजनक घटना समोर…
प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि.16:- माजी राष्ट्रपती डॉ.…
विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- दि.14 ऑक्टोबर 2024 सोमवार…
विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- तालुक्यातील जारावंडी-कसनसुर परिसरात अवैध…