Friday, March 6, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

बिहारप्रमाणे राज्यातील इतर मागासवर्गीयांची स्वतंत्र जनगणना करा; राष्ट्रवादी ओबीसी सेलची उपविभागीय अधिकारी हिंगणघाट यांचेकडे मागणी.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
January 20, 2023
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, वर्धा, विदर्भ
0 0
0
बिहारप्रमाणे राज्यातील इतर मागासवर्गीयांची स्वतंत्र जनगणना करा; राष्ट्रवादी ओबीसी सेलची उपविभागीय अधिकारी हिंगणघाट यांचेकडे मागणी.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मो .9284981757

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- नुकतीच बिहारमध्ये स्वतंत्रपणे जातनिहाय जनगणना सुरु झाली आहे. तामिळनाडू, छत्तीसगड आणि इतर अनेक राज्यांनी सुद्धा ओबीसी जनगणना केल्या असून त्यांच्या राज्याच्या विकासासाठी त्यांचा उपयोग झालेला आहे. महाराष्ट्रातही जातनिहाय जनगणना करण्याबाबतची अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची गेल्या कित्येक वर्षांपासूनची मागणी प्रलंबित आहे. जनगणना हा विषय केंद्र शासनाशी संबंधित आहे. मात्र इतर मागासवर्गाची स्वतंत्र जनगणना करण्यासाठी केंद्र सरकारने असमर्थता व्यक्त केली आहे. त्यामुळे राज्य शासनाने बिहार सरकारप्रमाणे ओबीसींची स्वतंत्र जनगणना करावी.

देशातील अनुसुचित जाती व जमातींची जातवार जनगणना करून दीडशे वर्षे होत आलेली आहे. स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने फक्त अनुसुचित जाती व जमाती यांची जातनिहाय तर इतर सर्वांची एकत्रित गणना करण्याचे धोरण स्विकारले. यातुन मागासवर्गीय ओबीसी वंचित राहिले. सन १९९४ साली केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने ओबीसी जनगणना कशी आवश्यक आहे ते सरकारला तिसऱ्यादा पटवून दिले. सन २०१० च्या ५ मे ला संसदेत राष्ट्रवादीचे नाशिकचे तत्कालीन संसद सदस्य समीर भुजबळ, स्व.गोपीनाथराव मुंडे यांचेसह १०० खासदारांनी ओबीसी जनगणनेचा ठराव केला. त्यासाठी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी स्वत: शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय प्रयत्न केले होते. त्यातुन २०११ ते २०१४ मध्ये केंद्राने सामाजिक व आर्थिक जातगणना (SECC 2011) केली. मात्र त्याची आकडेवारी राज्यांना दिली नाही.

देशात सन २०२१ सालच्या नियमित जनगनणेचे काम अद्याप व्हायचे आहे. त्यात ही जातनिहाय गणना करावी अशी आमची सातत्याने मागणी आहे. तरी, बिहारप्रमाणेच महाराष्ट्र शासनाने इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग यांची जनगणना करावी,अशी ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वरराराव बाळबुधे,जिल्हाध्यक्ष सुनिलभाऊ राऊत व सहकार नेते अँड. सुधिरबाबु कोठारी यांचे प्रमुख मार्गदर्शनाखाली ओबीसी जिल्हाध्यक्ष हरीशभाऊ काळे यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी ओबीसी सेलचे वतीने उपविभागीय अधिकारी हिंगणघाट यांना निवेदन देण्यात आले .

निवेदन देतांना प्रामुख्याने हिम्मतराव चतुर, विठ्ठल गुळघाणे शहरअध्यक्ष, आफताब खान, सुरेश सायंकार, धनंजय बकाने, राजेश धनरेल, प्रकाश राऊत, मोना रिठे महिला शहर अध्यक्ष, नितेश नवरखेडे, कविता मुंगले, सुरेशराव पांगुळ, दशरथ ठाकरे, तेजस तडस, प्रशांत लोणकर, सुरेंद्र टेंभुर्णे, पंकज पाके, विकी वाघमारे, अतुल चौधरी, पवन मुडे, मनोज घुमाडे, सुजाता जांभुळकर, माधवी देशमुख, सिमा तिवारी, संतोष खाडे, संजय कातरे, संजय चव्हाण, अनिल भोंगाडे, दिपक माडे, गजानन मुंगले ,माणिक लांडगे, सुर्यकांत तिजारे, विक्रांत भगत, जनार्दन राऊत, हेमंत चिरकुटे, नरेश पंपनवार, संजय कावळे, पिंटु काळे, शेरा, धिरज साळवी, नयन निखाडे, चिन्मय अमृतकर व मोठ्या प्रमाणात पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

     
        


    
Previous Post

अपघाताचे बहाण्याने जबरी चो-या करून दहशत माजविणारा टोळीतील गुन्हेगार इरफान इस्माईल सैय्यद व त्याचे इतर ०३ साथीदार यांचेवर मकोका

Next Post

प्रजासत्ताक दिनी आदीवासीच्या न्याय हक्कासाठी ममता गायकवाड यांचा पाटणा देवी ग्रामपंचायत समोर आत्मदहनाचा ईशारा.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
प्रजासत्ताक दिनी आदीवासीच्या न्याय हक्कासाठी ममता गायकवाड यांचा पाटणा देवी ग्रामपंचायत समोर आत्मदहनाचा ईशारा.

प्रजासत्ताक दिनी आदीवासीच्या न्याय हक्कासाठी ममता गायकवाड यांचा पाटणा देवी ग्रामपंचायत समोर आत्मदहनाचा ईशारा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In