मानवेल शेळके नाशिक जिल्हा प्रतिनिधी
नाशिक:- जिल्हातून एक खळबळजनक बातमी समोर आले. महाराष्ट्रातील रस्त्ये किती चांगले आहे हे सर्वांना पडलेलं कोड आहे. ते किती लोकांचे जीव घेणार हे समजण्या पलीकडे आहे.
आज राज्यात मुसळधार पाऊस पडत आहे त्यामुळे जनजीवन सर्वीकडे विस्कळीत झाले आहे. रस्त्याचे तर तीन तेरा वाजले आहे. त्यामुळे एक मन हेलावणारी घटना समोर आली आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हेदपाडा गावातील आहे. एका गर्भवती महिलेला रुग्णालयापर्यंत नेण्याकरिता तीच्या कुटुंबियाना अशी पायपीट करावी लागली. शुक्रवारी हेदपाडा या गावातील वैशाली सोमनाथ बेंडकोळी महिलेला 9 महिने पूर्ण झाल्याने प्रसुती कळा सुरू झाल्या. रस्त्यांच्या समस्येमुळे या गर्भवती महिलेला झोळीतून 3 किलोमिटर पायपीट करत मुख्य रस्त्यावर घेऊन यावं लागलं. मुख्य रस्त्यापासून 8 किलोमिटर असलेल्या अंबोली येथील शासकीय रुग्णालयात या महिलेने कन्यारत्नाला जन्म दिला. 300 लोकवस्ती असलेल्या हेदपाडा गावात दरवर्षी पावसाळ्यात रस्त्याच्या गंभीर समस्या उद्भवते. पावसाळ्यात हा रस्ता इतका चिखलमय होतो की त्यावरून दुचाकी नेणंही कठीण होतं. असुविधेमुळे होणारी ही अशी फरफट आता इथल्या नागरिकांना नेहमीचीच झाली आहे. आता आणखी किती वर्ष असा अंत पाहिला जाणार असा उद्विग्न प्रश्न इथले लोक विचारू लागलेत.