✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि.4:- वर्धा, नागपूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर व गोंदिया जिल्ह्यातील अविवाहित तरुणांकरीता अग्नी भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे साडेसतरा ते 21 वर्ष वयाच्या तरुणांनी भरती प्रक्रियेसाठी दि.15 मार्च पर्यत अर्ज सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
भरती करीता विविध प्रवर्गासाठी भरतीपुर्व ऑनलाईन संगणकीय प्रणालीव्दारे दि.17 एप्रिल पासुन परीक्षा सुरु करण्यात येईल. भरतीसाठी पात्रता अग्नीवीर जीडी करीता उमेदवार दहावी मध्ये 45 टक्के उत्तीर्ण झालेला असावा व प्रत्येक विषयात 33 टक्के गुण असावे. अग्नीवरी टेक्नीकल करीता उमेदवार बारावी मध्ये 50 टक्के गुण घेऊन उत्तीर्ण असावा. फिजीक्स, केमेस्ट्री, मॅथ व इंग्रजी विषयात प्रत्येकी 40 टक्के गुण घेतलेले असावे. अग्नीवीर क्लर्क, एसकेटी करीता उमेदवार बारावी मध्ये 60 टक्के व प्रत्येक विषयात 50 टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झालेला असावा. अग्नीवीर ट्रेडस्मन करीता उमेदवार 10 वी मध्ये प्रत्येक विषयात 33 टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झालेला असावा.
यावर्षी दहावी व बारावी करीता परीक्षेला बसलेले उमेदवार देखील सदर भरती प्रक्रियेसाठी अर्ज करु शकतात. तथापी निवड प्रक्रियेच्या दुसऱ्या टप्प्यापुर्वी त्यांनी त्यांची शैक्षणिक अर्हता प्राप्त केल्याची मुळ कागदपत्रे सादर करणे बंधनकारक राहील. इच्छुक पात्र युवकांनी www. join indianarmy.nic.in या संकेत स्थळावर ऑनलाईन अर्ज करावे. अधिक माहितीसाठी सैन्य भरती कार्यालय, नागपूर यांच्या 0712-2558020 या दुरध्वनी क्रमांकावर किंवा aronagpur1@ gmail.com या इमेलवर संपर्क साधावा, असे जिल्हा सैनिक कल्याण फ्ला. ले. धनंजय सदाफळ यांनी कळविले आहे.
★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

